Skip to main content

किनवट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरीत सुरू करा व दुभाजक बसवा- मराठी पत्रकार परिषदेची मागणी

 


किनवट : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161/A मागील पाच ते सहा वर्षांपासून रेंगाळत पडलेल्याने व रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व धुळीमुळे नागरिकांना अतोनात होत असलेल्या त्रासाबाबत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनावेळी शारदा कंट्रक्शनच्या वतीने पाच दिवसात आम्ही रस्ता दुरुस्त करणार असे लेखी आश्वासन देण्यात आले.

दोन तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे शहरातील वाहतूक पूर्ण पणे विस्कळीत झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा ही लागल्या होत्या. काही काळ वाहतूक विस्कळीत होऊन नंतर पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत केली.

मागील पाच ते सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते अशोक स्तंभ व स्व. बाळासाहेब ठाकरे चौक ते गोकुंदा येथील पेट्रोल पंप पर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे व धुळीचे साम्राज्य होऊन अपघात ही झाले तसेच रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर बसवण्यात आले नाही  याप्रकरणी वारंवार शासनाला निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आली नसल्याने मराठी पत्रकार संघाच्या वतीने रास्तारोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती त्या रास्तारोकोला सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवून रास्तारोको यशस्वी केले. रास्तारोको आंदोलनावेळी शासनाने नियुक्त केलेल्या शारदा कंट्रक्शनचे शेख जावेद व रोशन चव्हाण यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार त्वरित कामाला सुरुवात करून पाच दिवसात आम्ही रोडची दुरुस्ती करू असे लेखी पत्र मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्ष्यांकडे सोपविल्याने दोन तास सुरू असलेले रास्तारोको आंदोलन पाच दिवसासाठी मागे घेण्यात आले पाच दिवसानंतर रोडची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.


यावेळी वैजनाथ करपुडे पाटील व्यंकट भंडारवार माजी नगराध्यक्ष के.मूर्ती पत्रकार मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दगडू भरकड परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष फुलाची गरज पाटील जेष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर तालुकाध्यक्ष प्रमोद पोहरकर सचिव बालाजी सिरसाट कार्याध्यक्ष किरण ठाकरे ,बबन वानखेडे ,विलास सूर्यवंशी ,दिलीप पाटील ,गौतम येरेकर, दुर्गादास राठोड ,विनोद भरणे ,शरद जैस्वाल अमरदीप कदम प्रशांत कोरडे प्रशांत सातुरवार ,संदीप कराळे, सुनील चव्हाण, विश्वास कोल्हारीकर, शैलेश गटलेवार,,मिलिंद धावारे ,नागनाथ भालेराव यांच्यासह रास्तारोको आंदोलनात सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व पत्रकार मंडळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.