किनवट: अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्यकेंद्र, मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील 'राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार किनवट जि.नांदेड येथील साहित्यिक कवी.रामस्वरूप मडावी यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहास दिनांक ८ जुन २०२४ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे (प.) येथे प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार मराठी साहित्य मंडळ आयोजित २०वे राज्यस्तरीय काव्यसंमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटक मा.संजय केळकर साहेब, (आमदार ठाणे शहर विधानसभा) यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ लेखक सिध्देश्वर कोळी,(महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष उस्मानाबाद), स्वागताध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट, प्रमुख अतिथी प्रतिभाताई राजेश मढवी(माजी नगरसेविका,नौपाडा विभाग) या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल,सन्मानचिन्ह व मानदपत्र असे होते.या प्रसंगी राज्यस्तरीय काव्यसंमेलनात राज्यातील प्रसिद्ध साहित्यिक कवी यांनी हजेरी लावली. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या प्रेरणेतून, आयोजक प्रणिता देवरे (ठाणे जिल्हाउपाध्यक्षा) आणि डॉ. राजेंद्र कवडे ( ठाणे जिल्हाउपाध्यक्ष )यांनी यशस्वी केला.
कवी रामस्वरूप मडावी यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल किनवट येथील साहित्य क्षेत्रातील मंडळी सर्वश्री डॉ. उत्तम कानिन्दे, रमेश मुनेश्वर, मोहन जाधव(मुख्याध्यापक), रुपेश मुनेश्वर, सुर्यभान खंदारे, किशन धुर्वे,देविदास वंजारे,प्रदीप कुडमेथे,सुरेश पाटील, राजेश पाटील, व मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्या
Comments
Post a Comment