Skip to main content

'काहूर' काव्यसंग्रहास राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार प्राप्त.

 


किनवट: अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्यकेंद्र, मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील 'राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार  किनवट जि.नांदेड येथील साहित्यिक कवी.रामस्वरूप मडावी यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहास दिनांक ८ जुन २०२४ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे (प.) येथे प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार मराठी साहित्य मंडळ आयोजित २०वे राज्यस्तरीय काव्यसंमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटक मा.संजय केळकर साहेब, (आमदार ठाणे शहर विधानसभा) यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ लेखक सिध्देश्वर कोळी,(महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष उस्मानाबाद), स्वागताध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट, प्रमुख अतिथी प्रतिभाताई राजेश मढवी(माजी नगरसेविका,नौपाडा विभाग) या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल,सन्मानचिन्ह व मानदपत्र असे होते.या प्रसंगी राज्यस्तरीय काव्यसंमेलनात राज्यातील प्रसिद्ध साहित्यिक कवी यांनी हजेरी लावली. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या प्रेरणेतून, आयोजक प्रणिता देवरे (ठाणे जिल्हाउपाध्यक्षा) आणि डॉ. राजेंद्र कवडे ( ठाणे  जिल्हाउपाध्यक्ष )यांनी यशस्वी केला. 

कवी रामस्वरूप मडावी यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल किनवट येथील साहित्य क्षेत्रातील मंडळी सर्वश्री डॉ. उत्तम कानिन्दे, रमेश मुनेश्वर, मोहन जाधव(मुख्याध्यापक), रुपेश मुनेश्वर, सुर्यभान खंदारे, किशन धुर्वे,देविदास वंजारे,प्रदीप कुडमेथे,सुरेश पाटील, राजेश पाटील, व मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्या

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...