Skip to main content

शहरवासियांनी उद्यानांचा जास्‍तीत जास्‍त उपयोग करुन घ्‍यावा. - मुख्‍याधिकारी श्री. काकडे

 



(नगरपरिषद किनवट च्‍या वतीने वसंतराव नाईक बाल उद्यान परीसरात श्रमदान व स्‍वच्‍छता अभियान संपन्‍न)

किनवट:-

माझी वसुंधरा व स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत नगरपरिषद किनवट च्‍या वतीने मुख्‍याधिकारी श्री.मुगाजी काकडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक बाल उद्यान साईनगर येथे दि.८/०५/२०२४ रोजी श्रमदान व स्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात आले. पावसाळयापुर्वी उद्यानात वाढलेली झुडपे, गवत, झाडांच्‍या फांद्या इत्‍यादींची छटाई करण्‍यात येऊन झाडांचा पाला-पाचोळा संकलीत करण्‍यात आले. सकाळी 7.00 वाजता सुरु करण्‍यात आलेल्‍या अभियानात नगर परिषद किनवट चे सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, साईनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड.सुनील येरेकार, श्री. अजय कदम श्री. संजय धोबे माहेर दवाखान्याचे डॉ. अनिल राठोड यांच्‍या टिमने सहभाग नोंदिवला.

 श्रमदान अभियानाच्‍या प्रसंगी मुख्‍याधिकारी श्री.काकडे यांनी शहरवासियांना अहवान करत शहरात असलेल्‍या साईनगर व सुभाषनगर येथील असलेल्‍या उद्यानांचा नागरीकांनी व्यायाम, मनोरंजन, इत्‍यादी कार्यक्रमासाठी जास्‍तीत जास्‍त उपयोग करुन घ्‍यावा असे मत व्‍यक्‍त केले. सदरील उपक्रमात पा.पु. व स्‍वच्‍छता अभियंता श्री.अशोक भालेराव, कार्यालयीन अधिक्षक अर्चना भिसे, अभियंता अभिजित मिरकले, राहुल सातुरवार, स्‍टॅलिन आडे, राजू पिल्लेवार, विजया वाघमारे, तोफीक खान, अब्दुल अल्ताफ, सटवाजी डोकळे, परमेश्वर काचमोडे, किरण कलगोटुवार, फारुख सत्‍तार, स.जमिर, शेख रियाज, लक्ष्मण कोल्हे,अब्दुल रज्जाक,निखिल वाघाडे, शंकर शिवन्‍ना, व्‍यंकटेश मुकनेपेल्‍लीवार, साहील काशेटवार, दत्‍ता कोल्‍हे, रजनिकांत राईंचवार, किरण दुधीवार इ. सहभाग नोंदविला.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला