किनवट ( प्रतिनिधी ) : डिजिटल इंडिया होत असताना आजही किनवट नगरपालिकेकडून मालमत्ताधारकांना घर कर, पाणी कर, इतर टॅक्स पावती हाताने जीर्ण झालेल्या कागदावर लिहून देत आहेत. परिणामी मालमत्ता धारकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
मालमत्ता धारकांनाच वर्षानुवर्ष टॅक्स पावत्या सांभाळून ठेवावे लागते. नोंद घेतलेल्या रजिस्टरवर हवा तशा नोंदी घेतल्या जातात. जास्तीचे कर लिहून पुन्हा त्यात खडाखोड झाल्याचा प्रकार पाहावयास मिळतो. जुनी कर पावती जर हरवले तर मग काही सोयच नाही. जुनी पावती आणा दुरुस्त करून देतो असे सर्रास चाललेले आहे. यावर आळा बसायचा असेल तर संगणकीय कर पावत्या द्याव्यात आणि रजिस्टर वर नोंद न ठेवता संगणकीय नोंदी ठेवाव्यात यामुळे कामात पारदर्शकता येईल आणि मालमत्ता धारकांची गैरसोय होणार नाही.
अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट सम्राट मिलिंद सर्पे यांनी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
Comments
Post a Comment