किनवट : कोठारी येथील मातोश्री कमलताई ठमके मधील इयत्ता दहावी शिकणारी कु. वसुंधरा आत्मानंद सत्यवंश हिने दहावीत नेत्रदिपक यश संपादन केले आहे .
वसुंधरा ही किनवट येथील कोठारी/ गोकुंदा येथील शाळेची विद्यार्थिनी असुन नुकताच दहावी बोर्डीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत वसुंधरा हिने ९०.६०% गुण घेतले आहेत .
अथक परिश्रम, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अभ्यास करून हे यश तिने संपादन केले आहे .
गृहलक्ष्मी महिला ग्राम विकास संस्थेचे आत्मानंद सत्यवंश , संगिता पाटील( सत्यवंश) यांची ती कन्या आहे.
या यशा बद्दल तिचे सर्व स्तरातुन कौतुक करण्यात येत आहे .
यावेळी तिचे मार्गदर्शक चौधरी सर , गायकवाड सर व इतर शिक्षीका शिक्षकवृंद , परिवारातील सदस्य आजी राहीबाई पाटील इंद्राबाई ठमके, शिलरत्न पाटील , सिमा पाटील, राजेश पाटील, अंबर ठमके, वर्षा, प्रतिक्षा, मनोहर पाटील , गौतम पाटील, सर्व परिवारातील सदस्य नातेवाईक मैत्रीणींनी आदी मंडळीनी तिचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment