प्रतिनिधी किनवट:- ०६
सध्या मराठवाड्यात व नांदेड जिल्ह्यात कडाक्याचे उन्ह वाढले असून सकाळी १० वाजल्या पासुन उन्हाची प्रचीती येते आहे दुपारच्या वेळी तर रस्त्यावर सगळा शुकशुकाट दिसुन येत आहे दुपार पासुन सहा वाजे पर्यंत एकही माणूस दिसेनासा झाला आहे व्यापारी दुकानदार देखील उन्हामुळे ग्राहक ग्रामीण भागातील लोक नसल्याने भवनी सुद्धा होत नसल्याचे एकावयास मिळत आहे या कडाक्याचे उन्हामुळे उकाडा वाढला असून करंट देखील जात असल्याने लोक महावितरण कार्यालयात वांरवार फोन लावून विचारना करत आहेत सध्या ४२ ° अंशावर पार गेला असून वेग वेगळे आजार जसे उन्ह लागने चक्कर येणे असे आजार उद्भवताना दिसून येते आहे उन्हाच्या तिव्रतेने लोक शितपेयाची मागणी वाढली आहे तर दुसरीकडे किनवट मध्ये एकही पानपोई नसल्याने ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होत आहे.
Comments
Post a Comment