Skip to main content

अंबाडी येथे युवक व महिलेचा फावड्याने खुन कारण अद्याप अस्पष्ट .... मयतच्या भावाचे शांततेचे आवाहन




तालुका प्रतिनिधी किनवट  :-घराचे बांधकाम करणारा मिस्त्री व शेजारच्या महिलेच्या डोक्यात फावड्याने वार करून दोघांनाही निघृणपणे ठार मारल्याची घटना बुधवारी (दि. २९) दुपारी ४:३० वाजता किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडी येथे घडली. पोलिसांनी आरोपी उत्तम भरणे यास तत्काळ अटक केली आहे.

गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील मृतदेह घेऊन नातेवाईक पोलिस ठाण्यात आले. आरोपीला फाशी देण्यात यावी म्हणून घोषणाबाजी करत दुकाने बंद करण्यात आली. काहींनी दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मांडवी, इस्लापूर व सिंदखेड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.

मृत मिस्त्री शेख वसीम शेख महेबूब कुरेशी (२९, रा. इस्लामपुरा, किनवट) यांच्या मारेकऱ्याला फाशी द्यावी, म्हणत घोषणाबाजी करत चक्क मृतदेह नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात आणला.दगडफेक करून गोकुंदा व शहरातील दुकाने बंद करण्यात आली. तणावपूर्ण शांतता प्रस्थापित झाल्याने भोकरचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे हे वेळीच किनवट शहरात दाखल झाले. बंदोबस्तासाठी मांडवी, सिंदखेड व इस्लापूर ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर तणाव निवळला. आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांच्या गोळ्या चालू असल्याची माहिती आहे. हल्ल्याचे कारण अजूनही अस्पष्टच आहे.

पोलिस सूत्रांनुसार व प्राप्त माहितीनुसार, किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंबाडी येथे आरोपी उत्तम भरणे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. किनवट येथील शेख वसीम शेख महेबूब कुरेशी (२९) हा २९ मे रोजी घराचे बांधकाम करण्यासाठी अंबाडी येथे गेला. वीट बांधकाम करत असतानाच अचानक आरोपी उत्तम भरणे याने मिस्त्री शेख वसीम यांच्या डोक्यात फावड्याने जबर वार केला. गंभीर दुखापत झाल्याने वसीम रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर शेजारी असलेल्या विशाखां भारत मुनेश्वर (५०) या महिलेच्या डोक्यात त्याच फावड्याने निघृणपणे वार केला. दोघांनाही • गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. प्रतीक्षा डोंगरे यांनी मृत घोषित केले.

......खुद्द भोकरचे अपर पोलिस अधीक्षकं डॉ. के. ए. धरणे, किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे, पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला लक्ष ठेवून होते, ठाण्यात आणलेला मृतदेह पोलिस बंदोबस्तात परत शवविच्छेदन करण्यासाठी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला