Skip to main content

अंबाडी येथे युवक व महिलेचा फावड्याने खुन कारण अद्याप अस्पष्ट .... मयतच्या भावाचे शांततेचे आवाहन




तालुका प्रतिनिधी किनवट  :-घराचे बांधकाम करणारा मिस्त्री व शेजारच्या महिलेच्या डोक्यात फावड्याने वार करून दोघांनाही निघृणपणे ठार मारल्याची घटना बुधवारी (दि. २९) दुपारी ४:३० वाजता किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडी येथे घडली. पोलिसांनी आरोपी उत्तम भरणे यास तत्काळ अटक केली आहे.

गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील मृतदेह घेऊन नातेवाईक पोलिस ठाण्यात आले. आरोपीला फाशी देण्यात यावी म्हणून घोषणाबाजी करत दुकाने बंद करण्यात आली. काहींनी दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मांडवी, इस्लापूर व सिंदखेड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.

मृत मिस्त्री शेख वसीम शेख महेबूब कुरेशी (२९, रा. इस्लामपुरा, किनवट) यांच्या मारेकऱ्याला फाशी द्यावी, म्हणत घोषणाबाजी करत चक्क मृतदेह नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात आणला.दगडफेक करून गोकुंदा व शहरातील दुकाने बंद करण्यात आली. तणावपूर्ण शांतता प्रस्थापित झाल्याने भोकरचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे हे वेळीच किनवट शहरात दाखल झाले. बंदोबस्तासाठी मांडवी, सिंदखेड व इस्लापूर ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर तणाव निवळला. आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांच्या गोळ्या चालू असल्याची माहिती आहे. हल्ल्याचे कारण अजूनही अस्पष्टच आहे.

पोलिस सूत्रांनुसार व प्राप्त माहितीनुसार, किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंबाडी येथे आरोपी उत्तम भरणे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. किनवट येथील शेख वसीम शेख महेबूब कुरेशी (२९) हा २९ मे रोजी घराचे बांधकाम करण्यासाठी अंबाडी येथे गेला. वीट बांधकाम करत असतानाच अचानक आरोपी उत्तम भरणे याने मिस्त्री शेख वसीम यांच्या डोक्यात फावड्याने जबर वार केला. गंभीर दुखापत झाल्याने वसीम रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर शेजारी असलेल्या विशाखां भारत मुनेश्वर (५०) या महिलेच्या डोक्यात त्याच फावड्याने निघृणपणे वार केला. दोघांनाही • गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. प्रतीक्षा डोंगरे यांनी मृत घोषित केले.

......खुद्द भोकरचे अपर पोलिस अधीक्षकं डॉ. के. ए. धरणे, किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे, पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला लक्ष ठेवून होते, ठाण्यात आणलेला मृतदेह पोलिस बंदोबस्तात परत शवविच्छेदन करण्यासाठी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.