Skip to main content

महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा ची उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम!

 


    किनवट प्रतिनिधी:-

   बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत किनवट सारख्या दुर्गम भागातील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे . विज्ञान शाखेचा 99.5% तर कला शाखेचा 88.44% निकाल लागलाअसून विशेष म्हणजे गुणवत्तेत मुलापेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेतुन कु. येरेकार आराध्या अनिलकुमार या विद्यार्थिनीने 89.33% व कला शाखेतून कु सुंकरवार रेणुका राजू  हिने 89.83 %   गुण घेऊन विज्ञान व कला शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.


उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाअसून या परीक्षेत गोकुंदा येथील मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडीद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेतील एकूण 422 विद्यार्थ्यांपैकी 418 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 54 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 255 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीची गुणवत्ता प्राप्त केली आहे व कला शाखेतील 199 विद्यार्थ्यांपैकी 176 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यापैकी 11विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 57 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीचे गुण प्राप्त केले आहेत.विशेष म्हणजे animal science या विषयात आडे ज्ञानेश्वर नामदेव या विद्यार्थ्याने 100 पैकी 100गुण प्राप्त केले आहेत व कला शाखेतील विद्यार्थिनी कू.रिया मनोहर मुंडे हिने शिक्षणशास्त्र या विषयात 100 पैकी 100गुण प्राप्त करून विशेष प्रावीण्य मिळवले आहे.या यशाबद्दल संस्थेचे सचिव अभि.प्रशांत ठमके, कोषाध्यक्ष्या शुभांगीताई ठमके, मुख्याध्यापक अंबादास जुनगरे  उपप्राचार्य राधेश्याम जाधव पर्यवेक्षक श्री संतोष बैसठाकूर यांच्यासह शिक्षकवृंद व शाळेच्या कर्मचाऱ्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...