किनवट प्रतिनिधी:-
बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत किनवट सारख्या दुर्गम भागातील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे . विज्ञान शाखेचा 99.5% तर कला शाखेचा 88.44% निकाल लागलाअसून विशेष म्हणजे गुणवत्तेत मुलापेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेतुन कु. येरेकार आराध्या अनिलकुमार या विद्यार्थिनीने 89.33% व कला शाखेतून कु सुंकरवार रेणुका राजू हिने 89.83 % गुण घेऊन विज्ञान व कला शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.
उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाअसून या परीक्षेत गोकुंदा येथील मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडीद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेतील एकूण 422 विद्यार्थ्यांपैकी 418 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 54 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 255 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीची गुणवत्ता प्राप्त केली आहे व कला शाखेतील 199 विद्यार्थ्यांपैकी 176 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यापैकी 11विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 57 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीचे गुण प्राप्त केले आहेत.विशेष म्हणजे animal science या विषयात आडे ज्ञानेश्वर नामदेव या विद्यार्थ्याने 100 पैकी 100गुण प्राप्त केले आहेत व कला शाखेतील विद्यार्थिनी कू.रिया मनोहर मुंडे हिने शिक्षणशास्त्र या विषयात 100 पैकी 100गुण प्राप्त करून विशेष प्रावीण्य मिळवले आहे.या यशाबद्दल संस्थेचे सचिव अभि.प्रशांत ठमके, कोषाध्यक्ष्या शुभांगीताई ठमके, मुख्याध्यापक अंबादास जुनगरे उपप्राचार्य राधेश्याम जाधव पर्यवेक्षक श्री संतोष बैसठाकूर यांच्यासह शिक्षकवृंद व शाळेच्या कर्मचाऱ्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment