Skip to main content

महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा ची उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम!

 


    किनवट प्रतिनिधी:-

   बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत किनवट सारख्या दुर्गम भागातील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे . विज्ञान शाखेचा 99.5% तर कला शाखेचा 88.44% निकाल लागलाअसून विशेष म्हणजे गुणवत्तेत मुलापेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेतुन कु. येरेकार आराध्या अनिलकुमार या विद्यार्थिनीने 89.33% व कला शाखेतून कु सुंकरवार रेणुका राजू  हिने 89.83 %   गुण घेऊन विज्ञान व कला शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.


उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाअसून या परीक्षेत गोकुंदा येथील मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडीद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेतील एकूण 422 विद्यार्थ्यांपैकी 418 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 54 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 255 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीची गुणवत्ता प्राप्त केली आहे व कला शाखेतील 199 विद्यार्थ्यांपैकी 176 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यापैकी 11विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 57 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीचे गुण प्राप्त केले आहेत.विशेष म्हणजे animal science या विषयात आडे ज्ञानेश्वर नामदेव या विद्यार्थ्याने 100 पैकी 100गुण प्राप्त केले आहेत व कला शाखेतील विद्यार्थिनी कू.रिया मनोहर मुंडे हिने शिक्षणशास्त्र या विषयात 100 पैकी 100गुण प्राप्त करून विशेष प्रावीण्य मिळवले आहे.या यशाबद्दल संस्थेचे सचिव अभि.प्रशांत ठमके, कोषाध्यक्ष्या शुभांगीताई ठमके, मुख्याध्यापक अंबादास जुनगरे  उपप्राचार्य राधेश्याम जाधव पर्यवेक्षक श्री संतोष बैसठाकूर यांच्यासह शिक्षकवृंद व शाळेच्या कर्मचाऱ्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...