Skip to main content

महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा ची उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम!

 


    किनवट प्रतिनिधी:-

   बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत किनवट सारख्या दुर्गम भागातील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे . विज्ञान शाखेचा 99.5% तर कला शाखेचा 88.44% निकाल लागलाअसून विशेष म्हणजे गुणवत्तेत मुलापेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेतुन कु. येरेकार आराध्या अनिलकुमार या विद्यार्थिनीने 89.33% व कला शाखेतून कु सुंकरवार रेणुका राजू  हिने 89.83 %   गुण घेऊन विज्ञान व कला शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.


उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाअसून या परीक्षेत गोकुंदा येथील मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडीद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेतील एकूण 422 विद्यार्थ्यांपैकी 418 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 54 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 255 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीची गुणवत्ता प्राप्त केली आहे व कला शाखेतील 199 विद्यार्थ्यांपैकी 176 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यापैकी 11विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 57 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीचे गुण प्राप्त केले आहेत.विशेष म्हणजे animal science या विषयात आडे ज्ञानेश्वर नामदेव या विद्यार्थ्याने 100 पैकी 100गुण प्राप्त केले आहेत व कला शाखेतील विद्यार्थिनी कू.रिया मनोहर मुंडे हिने शिक्षणशास्त्र या विषयात 100 पैकी 100गुण प्राप्त करून विशेष प्रावीण्य मिळवले आहे.या यशाबद्दल संस्थेचे सचिव अभि.प्रशांत ठमके, कोषाध्यक्ष्या शुभांगीताई ठमके, मुख्याध्यापक अंबादास जुनगरे  उपप्राचार्य राधेश्याम जाधव पर्यवेक्षक श्री संतोष बैसठाकूर यांच्यासह शिक्षकवृंद व शाळेच्या कर्मचाऱ्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला