किनवट प्रतिनिधी:- दि.१९
भाजपने जाती जातीत वीष पेरण्याच काम केलं असा घनाघात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला किनवट येथील हुतात्मा गोंडराजे मैदान किनवट येथील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार सभेत त्यांनी आपले मत मांडले हिंगोली लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी यांची जाहीर सभा घेण्यात आली होती मंचावर आदिवासी नेते शिवाजीराव मोघे माजी आमदार खाजा बेग आर्णि,माजी आमदार प्रदीप नाईक बबनराव थोरात,वसीम देशमुख , ज्योतिबा दादा खराटे , सूर्यकांत रेड्डी कल्यामवार ,के .मूर्ती , गिरीश नेम्मनिवार ,राहुल नाईक , सचिन कदम( संभाजी ब्रिगेड), प्रवीण राठोड , प्रा. शिल्लेवार , बाबुराव जाटवे , काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) ,(उद्धव बाळासाहेब ठाकरे )शिवसेना आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी गटनेते तालुकाध्यक्ष संपर्कप्रमुख विविध भागातील कार्यकर्ते लाखोच्या संख्येने उपस्थित होते
पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या या भाजपवाल्याने इतकी महागाई वाढवली की सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे हे सरकार फक्त जाहिरातबाजी आणि खोटे बोलण्यात पटाईत आहेत आमची मुलं मुली किती शिकले तरी त्यांच्या डिग्य्रा काही कामाच्या राहिल्या नाहीत कारणआमच्या मुली फार्मसी शिकतात डिग्री घेऊन येतात जर आर्थिक बाजू भक्कम असेल तर मेडिकल टाकतात नसेल तर औषध बनवण्याच्या कंपन्यांच्या कारखान्यात जातात आता तर ते सुद्धा राहिले नाही आपल्या औषधी बनवण्याच्या कंपन्या सुद्धा गुजरातमध्ये गेले आहेत त्यामुळे आमच्या मुलांनी काय करायचे हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे अशा शेलक्या या शब्दात त्यांनी समाचार घेतला संविधान वाचवण्यासाठी व आत्मसन्मानाची लढाई जिंकण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीला विजयी करा असे प्रतिपादन त्यांनी केलेया सभेस लाखोच्या संख्येने हिंगोली हदगाव किनवट माहूर अशा विविध भागातून पदाधिकारी कार्यकर्ते व लाखोच्या संख्येने गावकरी पत्रकार बांधव उपस्थित होते
Comments
Post a Comment