Skip to main content

भाजपनी जाती जातीत विष पेरण्याच काम केल - सुषमा अंधारे यांचा घनाघात

 


किनवट प्रतिनिधी:- दि.१९

भाजपने जाती जातीत वीष पेरण्याच काम केलं असा घनाघात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला किनवट येथील हुतात्मा गोंडराजे मैदान किनवट येथील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार सभेत त्यांनी आपले मत मांडले हिंगोली लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी यांची जाहीर सभा घेण्यात आली होती मंचावर आदिवासी नेते शिवाजीराव मोघे माजी आमदार खाजा बेग आर्णि,माजी आमदार प्रदीप नाईक बबनराव थोरात,वसीम देशमुख , ज्योतिबा दादा खराटे , सूर्यकांत रेड्डी कल्यामवार ,के .मूर्ती , गिरीश नेम्मनिवार ,राहुल नाईक , सचिन कदम( संभाजी ब्रिगेड), प्रवीण राठोड , प्रा. शिल्लेवार , बाबुराव जाटवे , काँग्रेस  , राष्ट्रवादी काँग्रेस  (शरद पवार ) ,(उद्धव बाळासाहेब ठाकरे )शिवसेना आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी गटनेते तालुकाध्यक्ष संपर्कप्रमुख विविध भागातील कार्यकर्ते लाखोच्या संख्येने उपस्थित होते

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या या भाजपवाल्याने इतकी महागाई वाढवली की सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे हे सरकार फक्त जाहिरातबाजी आणि खोटे बोलण्यात पटाईत आहेत आमची मुलं मुली किती शिकले तरी त्यांच्या डिग्य्रा काही कामाच्या राहिल्या नाहीत कारणआमच्या मुली फार्मसी शिकतात डिग्री घेऊन येतात जर आर्थिक बाजू भक्कम असेल तर मेडिकल टाकतात नसेल तर औषध बनवण्याच्या कंपन्यांच्या कारखान्यात जातात आता तर ते सुद्धा राहिले नाही आपल्या औषधी बनवण्याच्या कंपन्या सुद्धा गुजरातमध्ये गेले आहेत त्यामुळे आमच्या मुलांनी काय करायचे हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे अशा शेलक्या या शब्दात त्यांनी समाचार घेतला संविधान वाचवण्यासाठी व आत्मसन्मानाची लढाई जिंकण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीला विजयी करा असे प्रतिपादन त्यांनी केलेया सभेस लाखोच्या संख्येने हिंगोली हदगाव किनवट माहूर अशा विविध भागातून पदाधिकारी कार्यकर्ते व लाखोच्या संख्येने गावकरी  पत्रकार बांधव उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला