Skip to main content

भाजपनी जाती जातीत विष पेरण्याच काम केल - सुषमा अंधारे यांचा घनाघात

 


किनवट प्रतिनिधी:- दि.१९

भाजपने जाती जातीत वीष पेरण्याच काम केलं असा घनाघात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला किनवट येथील हुतात्मा गोंडराजे मैदान किनवट येथील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार सभेत त्यांनी आपले मत मांडले हिंगोली लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी यांची जाहीर सभा घेण्यात आली होती मंचावर आदिवासी नेते शिवाजीराव मोघे माजी आमदार खाजा बेग आर्णि,माजी आमदार प्रदीप नाईक बबनराव थोरात,वसीम देशमुख , ज्योतिबा दादा खराटे , सूर्यकांत रेड्डी कल्यामवार ,के .मूर्ती , गिरीश नेम्मनिवार ,राहुल नाईक , सचिन कदम( संभाजी ब्रिगेड), प्रवीण राठोड , प्रा. शिल्लेवार , बाबुराव जाटवे , काँग्रेस  , राष्ट्रवादी काँग्रेस  (शरद पवार ) ,(उद्धव बाळासाहेब ठाकरे )शिवसेना आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी गटनेते तालुकाध्यक्ष संपर्कप्रमुख विविध भागातील कार्यकर्ते लाखोच्या संख्येने उपस्थित होते

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या या भाजपवाल्याने इतकी महागाई वाढवली की सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे हे सरकार फक्त जाहिरातबाजी आणि खोटे बोलण्यात पटाईत आहेत आमची मुलं मुली किती शिकले तरी त्यांच्या डिग्य्रा काही कामाच्या राहिल्या नाहीत कारणआमच्या मुली फार्मसी शिकतात डिग्री घेऊन येतात जर आर्थिक बाजू भक्कम असेल तर मेडिकल टाकतात नसेल तर औषध बनवण्याच्या कंपन्यांच्या कारखान्यात जातात आता तर ते सुद्धा राहिले नाही आपल्या औषधी बनवण्याच्या कंपन्या सुद्धा गुजरातमध्ये गेले आहेत त्यामुळे आमच्या मुलांनी काय करायचे हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे अशा शेलक्या या शब्दात त्यांनी समाचार घेतला संविधान वाचवण्यासाठी व आत्मसन्मानाची लढाई जिंकण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीला विजयी करा असे प्रतिपादन त्यांनी केलेया सभेस लाखोच्या संख्येने हिंगोली हदगाव किनवट माहूर अशा विविध भागातून पदाधिकारी कार्यकर्ते व लाखोच्या संख्येने गावकरी  पत्रकार बांधव उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते