Skip to main content

राष्ट्रपिता जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन




 ✒️ राजेश पाटील

किनवट शहर प्रतिनिधी:-

राष्ट्रपिता जोतीराव यांची १९७ वीफुले व राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्या निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी दिली आहे.

११ एप्रील ते १४ एप्रील दरम्यान विविध सामाजिक उपक्रम तथा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे

११ एप्रिल रोजी महात्मा फुले चौक येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक परिसरात अभिवादन व ध्वजारोहन कार्यक्रम होईल 

नंतर किनवट परिसरात  सकाळी दहा वाजता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन (व्याख्यान) शिबिर होईल या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून  (बळीराम पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा व्याख्याते , अभ्यासक ) डॉ. पंजाब शेरे, रत्नदीप गंगाळे (सहाय्यक प्राध्यापक महात्मा ज्योतीबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क, संशोधन अधिकारी टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई ), स्वप्निल भालेराव (समतादुत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टी , पुणे, जनसंपर्क अधिकारी ),

हे उपस्थित राहणार आहेत तर दुपारी १२ वाजता रांगोळी स्पर्धा महिलां करिता होणार आहेत .

सांयकाळी ६ वाजता इयत्ता ५ वी ते१२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी फुले- आंबेडकर जिवन चरित्र या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन होणार आहे.

१२ एप्रिल रोजी ५ ते २५ वयोगटातील स्पर्धकासाठी सांस्कृतिक नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे सदरील नृत्य बुद्ध- भीम गितावर आधारित राहील .

१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पंचशिल ध्वजारोहण होईल या नंतर १० ते ४ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात 

भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरास डॉ. सुनंदा भालेराव, डॉ. मनोज घडसिंग, डॉ. सुरज वाकोडे, डॉ. महेंद्र ना. कांबळे, डॉ. पल्लवी कांबळे, डॉ. अश्वघोष गायकवाड,

डॉ. संजय लोमटे, डॉ. अभिजित ओव्हळ यांच्या तर्फे मोफत वैद्यकीय तपासणी होणार आहे तर मराठवाडा पॅथोलॉजी लॅब किनवट तर्फे मोफत रक्त तपासणी होईल 

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे फुले - आबेंडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम पाटील, उपाध्यक्ष निखिल दि. कावळे, योगेश भवरे ,सचिव प्रशिक मुनेश्वर, सह सचिव आकाश सर्पे, संघर्ष घुले, संयोजक सुरेश कावळे, कोषाध्यक्ष आकाश आळणे , सुरज भरणे, सहकोषाध्यक्ष स्वप्नील सर्पे, निवेदक कानिंदे व पदधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला