Skip to main content

मराठवाड्यातून सुपरफास्ट रेल्वेप्रवास; एप्रिलमध्ये नांदेड विभागातील सर्व लोहमार्ग होणार इलेक्ट्रिक




 रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.


नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड विभागात रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, ही कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलमध्येच विभागातील संपूर्ण मार्ग इलेक्ट्रिक रेल्वे धावण्यासाठी सज्ज होणार आहे.


रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात साधारणत: दीड वर्षापासून ही कामे सुरू असून, ती आता पूर्णत्वाला जात आहेत. विशेष म्हणजे, काही मार्गांवर आताच इलेक्ट्रिक रेल्वे धावत आहे.


प्राप्त माहितीनुसार, सद्य:स्थितीला नांदेड विभागातील ४५०.३९ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या मिरखेल ते नांदेड या साधारणत: ४३ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण शिल्लक आहे. ही कामे काही ठिकाणी दुसऱ्या आणि काही ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात आहेत. ३१ मार्चपर्यंत या मार्गावरची संपूर्ण कामे पूर्ण केली जाणार असून, एप्रिल महिन्यात नांदेड विभागातील सर्व रेल्वे मार्ग इलेक्ट्रिक रेल्वेसाठी सज्ज होण्याची शक्यता आहे


मराठवाड्यातून सुपरफास्ट रेल्वेप्रवास; एप्रिलमध्ये नांदेड विभागातील सर्व लोहमार्ग होणार इलेक्ट्रिक



रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.


मराठवाड्यातून सुपरफास्ट रेल्वेप्रवास; एप्रिलमध्ये नांदेड विभागातील सर्व लोहमार्ग होणार इलेक्ट्रिक


नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड विभागात रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, ही कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलमध्येच विभागातील संपूर्ण मार्ग इलेक्ट्रिक रेल्वे धावण्यासाठी सज्ज होणार आहे.


रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात साधारणत: दीड वर्षापासून ही कामे सुरू असून, ती आता पूर्णत्वाला जात आहेत. विशेष म्हणजे, काही मार्गांवर आताच इलेक्ट्रिक रेल्वे धावत आहे.


प्राप्त माहितीनुसार, सद्य:स्थितीला नांदेड विभागातील ४५०.३९ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या मिरखेल ते नांदेड या साधारणत: ४३ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण शिल्लक आहे. ही कामे काही ठिकाणी दुसऱ्या आणि काही ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात आहेत. ३१ मार्चपर्यंत या मार्गावरची संपूर्ण कामे पूर्ण केली जाणार असून, एप्रिल महिन्यात नांदेड विभागातील सर्व रेल्वे मार्ग इलेक्ट्रिक रेल्वेसाठी सज्ज होण्याची शक्यता आहे.


या मार्गावरून धावतात इलेक्ट्रिक रेल्वेसध्या परळी-परभणी-छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गावरून ६ प्रवासी रेल्वे आणि मालगाड्या इलेक्ट्रिक इंजिन जोडून धावतात. तसेच मुदखेड ते आदिलाबाद या रेल्वे मार्गावर एक प्रवासी रेल्वे आणि मालगाड्या इलेक्ट्रिक इंजिन जोडून धावतात.


पूर्ण झालेले विद्युतीकरणअकोला जंक्शन ते पूर्णा : २०५.५९ किमीपरभणी ते परळी : ६२.१३ किमी पिंपळखुटी ते मुदखेड जंक्शन : १८३.२६

३११ किमी झाली चाचणीनांदेड-मनमाड या मार्गावर अंकाई ते मुदखेड जंक्शन हे ४२५ किमीचे अंतर असून, त्यापैकी ३११.२४ किमी अंतराची विद्युतीकरणाची चाचणी पूर्ण झाली आहे. परभणी तालुक्यातील मिरखेल ते नांदेड तालुक्यातील मालटेकडीपर्यंतची ४३.३० किमीची कामे शिल्लक आहेत.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.