Skip to main content

धनगर समाज संघर्ष समितीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी अमन कुंडगीर

 


राज्यस्तरीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री मा.खा.डॉ. विकास महात्मे यांनी दिले नियुक्तीचे पत्र


किनवट ः धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य च्या युवक प्रदेश अध्यक्षपदी अमन कुंडगीर यांची नियुक्ती करण्यात आली. धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यचे द्वितीय राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी दि.10 मार्च 2024 रोजी क्षितिज पॅलेस अमरावती येथे पार पडले. या अधिवेशना दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री मा.खा.डॉ. विकास महात्मे यांचे हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. 

      आपले ध्येय आरक्षण मिळविणे असून वाड्या, वस्ती, डोंगराळ भागातील शेवटच्या धनगर बांधवांपर्यंत पोहचवून त्यांचा विकास करण्यासाठी अमन कुंडगीर यांना मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

         अमन कुंडगीर हे नेहमी समाजासाठी धडपडत असतात. त्यांनी केलेले उल्लेखनिय कार्य व सतत समाजाच्या प्रश्‍नासाठी आंदोलने, मोर्चे, सभा, बैठका या सर्व बाबींचा विचार करून त्यांना युवक प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले आहे. 

         धनगर समाजाचे ज्वलंत प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी व तळागाळातील प्रत्येक समाज बांधवांच्या समस्या आपण सोडवू असे यावेळी युवक प्रदेश अध्यक्ष अमन कुंडगीर यांनी सांगीतले. याप्रसंगी धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यचे प्रदेशाध्यक्ष अनंत बनसोडे, प्रदेश सचिव ज्ञानेश्‍वर परदेसी, महिला प्रदेशाध्यक्षा शितलताई चिंचोरे, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख सुनील धनगर यांचेसह समितीच्या सर्व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...