Skip to main content

वेतनात बदल नका करू साहेब वन कामगार महीलांची आर्त हाक वनपरिक्षेत्र अधिकारी,किनवट येथील वनकामगार महीलांचे उपोषण

 



किनवट/प्रतिनिधी:  गेल्या 13 दिवसापासून वन कामगार महिला वनपरिक्षेत्र कार्यालय किनवट येथे उपोषणाला बसल्या असून त्यांच्या मागण्या अद्यापही मंजूर झाल्या नाहीत.आशा कडक थंडीच्या दिवसात गेल्या 13 दिवसापासून धरणे आंदोलन करत असून या दरम्यानआमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही वनपरिक्षेत्र अधिकारी,किनवट यांच्यावर राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

वन कामगारांनी गेल्या13 दिवसापूर्वी वनपरिक्षेत्र कार्यालयात, किनवट, उपविभागीय कार्यालय किनवट व तहसीलदार कार्यालय किनवट येथे युएलपी 19 अभिलेख 2022 या प्रकरणातील कामगारांना सेवेत व वेतन बदल न करणे व रोपवाटिका लोणी मध्ये 8/ 2/2022 पासून कामावर चालू आहेत तरी आमची पगार मिळणे बाबतआशा आशयाचे निवेदन सादर केले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी वनपरिक्षेत्र कार्यालय किनवट तालुका किनवट जिल्हा नांदेड यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, न्यायालय आदेशातील सर्व कामगार आपले परिक्षेत्र अंतर्गत कार्यरत कामावर चालू आहेत. आमच्या सेवेत व वेतनात कसलीही बदल करू नये असा आदेश माननीय न्यायालयाचा आहे. आमच्या सेवेत आणि वेतनात बदल करू नये बदल केल्यास मा. न्यायालयाचा अपमान करत आहात असे होईल बदल केल्यास आम्हाला परत न्यायालयात धाव  घ्यावी लागेल. विनंतीपूर्वक विनंती करण्यात येते की आमची थकीत पगार देण्यात यावी. आम्ही सर्व स्त्रिया आमची पगार होईपर्यंत आम्ही सर्व कामगार वनपरिक्षेत्र कार्यालयातच थांबणार आहोत . त्या दिवसात आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही वनपरिक्षेत्र अधिकारी,किनवट यांच्यावर राहील करिता माहितीस्तव सविनय सादर.या निवेदनावर  भोजू रामा जाधव, साळूबाई प्रल्हाद काळे, कौशल्याबाई प्रल्हाद परचाके, शकुंतला निवृत्ती मगरे, मालाबाई गोपीनाथ तलांडे ,सविता मारुती कोटनाक, नर्मदाबाई आनंदा किनाके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.