Skip to main content

वेतनात बदल नका करू साहेब वन कामगार महीलांची आर्त हाक वनपरिक्षेत्र अधिकारी,किनवट येथील वनकामगार महीलांचे उपोषण

 



किनवट/प्रतिनिधी:  गेल्या 13 दिवसापासून वन कामगार महिला वनपरिक्षेत्र कार्यालय किनवट येथे उपोषणाला बसल्या असून त्यांच्या मागण्या अद्यापही मंजूर झाल्या नाहीत.आशा कडक थंडीच्या दिवसात गेल्या 13 दिवसापासून धरणे आंदोलन करत असून या दरम्यानआमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही वनपरिक्षेत्र अधिकारी,किनवट यांच्यावर राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

वन कामगारांनी गेल्या13 दिवसापूर्वी वनपरिक्षेत्र कार्यालयात, किनवट, उपविभागीय कार्यालय किनवट व तहसीलदार कार्यालय किनवट येथे युएलपी 19 अभिलेख 2022 या प्रकरणातील कामगारांना सेवेत व वेतन बदल न करणे व रोपवाटिका लोणी मध्ये 8/ 2/2022 पासून कामावर चालू आहेत तरी आमची पगार मिळणे बाबतआशा आशयाचे निवेदन सादर केले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी वनपरिक्षेत्र कार्यालय किनवट तालुका किनवट जिल्हा नांदेड यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, न्यायालय आदेशातील सर्व कामगार आपले परिक्षेत्र अंतर्गत कार्यरत कामावर चालू आहेत. आमच्या सेवेत व वेतनात कसलीही बदल करू नये असा आदेश माननीय न्यायालयाचा आहे. आमच्या सेवेत आणि वेतनात बदल करू नये बदल केल्यास मा. न्यायालयाचा अपमान करत आहात असे होईल बदल केल्यास आम्हाला परत न्यायालयात धाव  घ्यावी लागेल. विनंतीपूर्वक विनंती करण्यात येते की आमची थकीत पगार देण्यात यावी. आम्ही सर्व स्त्रिया आमची पगार होईपर्यंत आम्ही सर्व कामगार वनपरिक्षेत्र कार्यालयातच थांबणार आहोत . त्या दिवसात आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही वनपरिक्षेत्र अधिकारी,किनवट यांच्यावर राहील करिता माहितीस्तव सविनय सादर.या निवेदनावर  भोजू रामा जाधव, साळूबाई प्रल्हाद काळे, कौशल्याबाई प्रल्हाद परचाके, शकुंतला निवृत्ती मगरे, मालाबाई गोपीनाथ तलांडे ,सविता मारुती कोटनाक, नर्मदाबाई आनंदा किनाके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला