Skip to main content

आ. भिमराव केराम यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यासाठी ३ कोटी तर प्रलंबीत कामाकरीता ७ कोटी एकुण दहा कोटी निधी उपलब्ध करून दिले

 



किनवट ता. प्र दि २४ राज्यातील सत्तांतरा नंतर किनवट माहुर विधानसभा मतदारसंघामध्ये आ. भिमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या माध्यमातुन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास एकूण 3 कोटी व शहरातील इतर प्रलंबित विकास कामा करिता 7 कोटी रुपये निधी असे एकूण 10 कोटीचा निधी किनवट नगर परिषदेला उपलब्ध करून दिले आहे. आ. केराम हे आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करणे हेच धेय्य घेऊन सतत कार्यरत असलेले नेते म्हणुन त्यांची मागील ४० वर्षापासुन किनवट माहुर विधानसभा क्षेत्रात ख्याती आहे. २०१९ विधानसभा निवडणूकीत येथिल जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली परंतु सुरवातच हि कोरोना नावाच्या विषाणुने व राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याने त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले त्यामुळे मागील तीन वर्षात राज्यातील महाविकास आघाडी मुळे किनवट माहुर विधानसभा क्षेत्राचे विकास हे मनाजोगे करता आले नाही. 

परंतु राज्यात सत्तांतर झाल्या नंतर आ. केराम यांचे पिंड हे शिव, शाहू, फुले, आंबेडकर व बिरसा याच्या विचारांचे असल्याने इतिहासातील महापुरुष हा त्यांचा आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय असून विधानसभा क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपयाची कामे सुरु असतांना त्यांच्या मनात असलेल्या विषयाला न्याय मिळवुन देण्याचे प्रयत्न सातत्याने चालु होते त्याअनुषंगाने  नुकतेच त्यांनी हुतात्मा गोंडराजे मैदान सुषोभीकरण करण्याच्या कामास सुरवात केली. त्यापाठोपाठ किनवट शहर व तालुक्यातील तमाम शिवभक्त व आंबेडकरी अनुयायांचा आस्थेचा विषय असलेला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा या दोन्ही पुतळ्याच्या पुर्णजिवनाचा विषय गाजत असतांना कोणताही गाजावाजा न करता आ. केराम यांनी सदरील दोन्ही पुतळ्या करिता ३ कोटी रुपये निधी मंजुर करवुन घेतला आहे. 

तर भाजपाचे शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी सांगितले कि किनवट नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही व उपनगराध्यक्ष व सर्व पक्षिय नगरसेवकांनी शहरातील दोन्ही महापुरुषाचे पुतळे भव्य स्वरुपात व्हावे या करिता प्रयत्न, पाठपुरावा केला होता तर आ. केराम यांनी भरघोस निधी उपलब्ध करुन दिल्यांने आम्ही किनवट्च्या जनतेच्या वतीने आमदार केराम यांचे आभार मानतो.

(चौकटः  तर आ. केराम यांनी यावेळी बोलतांना सांगितले कि सुमारे ४० वर्ष माझ या शहरात वास्तव्य आहे हे शहर माझ्या जिवनातील सुख व दुखाच्या प्रसंगाचा साक्षिदार आहे व मला या शहराने खुप काही दिले आहे त्याच बरोबर जेवढे प्रेम मला या शहरातील नागरीकांनी दिले त्यांचे ऋण मी कधीच फेडु शकत नाही परंतु माझ्या हातुन या मतदारसंघातील नागरीकांसाठी जेवढे चांगले होईल ते मी करण्याचे प्रयत्न करणार तर शहरातील व विधानसभा क्षेत्रातील तरुण पिढीने आपल्या महापुरुषांना पाहून त्यांच्याकडून बोध घेणे आवश्यक असून शहरात होणारे हे दोन्ही महापुरुषांचे भव्य दिव्य पुतळे युवकांना प्रेरित करतील. )

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला