Skip to main content

किनवट तालुका पत्रकार परिषदेच्या अध्यक्ष म्हणुन दत्ता जायभाये, सचिवपदी दिलीप पाटील तर कार्याध्यक्षपदी मलीक चव्हाण यांची निवड

 



किनवट (प्रतिनिधी) :-

तालुका: पत्रकार परिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक 22/12/2022 गरुवार रोजी मा.नगराध्यक्ष ईसाखान सरदार खान यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव नेममनिवार निवडणूक अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत इसाखान सरदार खान यांच्या फार्म हाऊसवर पुढील एक वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात संपलेला असून मावळते अध्यक्ष अनिल भंडारे व सचिव मलिक चव्हाण यांनी एकमताने बिनविरोध नवीन कार्यकारणीची घोषणा केली. अध्यक्षपदी दत्ता जायभाय सचिव पदी दिलीप पाटील तर कार्याध्यक्षपदी मलिक चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेचे सल्लागार म. आ. चौधरी, शिवराज मामा, दादाराव कयापाक, एड. मिलिंद

आली. जुन्या कार्यकारणीच्या कार्यकाळ संपल्यानंतर  नव्या कार्य कारणीची घोषणा करण्यात आली . 

या वेळी पत्रकार परिषदेचे सल्लागार म. आ. चौधरी,राघू मामा, दादाराव कयापाक, एड. मिलींद सर्पे, शकील बडगुजर, चतुरंग कांबळे, सुनील श्रीमनवार, जयवंत चव्हाण, आशिष देशपांडे, दुर्गादास राठोड, अनिल भंडारे, संदीप निखाते आदी उपस्थित होते. 


नवीनकार्यकारणी पुढीलप्रमाणे.


अध्यक्ष दत्ता जायभाये ,सचिव दिलीप पाटील,कार्याध्यक्ष  मलीक चव्हाण,उपाध्यक्ष गौतम येरेकर, सहसचिव किशन परेकार, कोषाध्यक्ष विवेक ओंकार, सहकोषाध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे

सदस्य:

साजिद बडगुजर, एस. अहमद अली,मधुकर अन्नेलवार, संतोष सीसले, शेख मजहर, गजानन जाधव, जयपाल राठोड, संतोष जाधव, प्रमोद जाधव, परमेश्वर पेशवे, नागनाथ जाधव, सचिन भालेराव सतिश पाटील, दिपक तामगाडगे यांची सवानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दुर्गादास राठोड यांनी केले तर आभार विवेक ओंकार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...