Skip to main content

५० ग्रामपंचायतीचे भवितव्य ईव्हियम यंत्रात बंद ,७०% मतदान झाले

 



किनवट : रविवारी (दि.18 ) तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी 146 मतदान केंद्रावर निवडणूक लढविणाऱ्या सरपंच पदाच्या 137 व सदस्य पदाच्या एकूण 722 उमेदवारांचं भवितव्य अंदाजे सत्तर टक्के मतदारांनी मतदान करून केलं मतदान यंत्रात बंद


सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी नेहा भोसले, भाप्रसे व निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी सकाळ पासून दिले होते.. तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित शांतपणे पार पडत असल्याचा अनुभव त्यांनी प्रत्यक्ष पाहणीत घेतला. बुधवार पेठ, शनिवार पेठ ही दोन गावे तसेच 07 सरपंच व 77 सदस्य बिनविरोध झालीत. सक्रुनाईक तांडा येथून एकही नामनिर्देशन दाखल झालं नाही. त्यामुळे ही तीन गावे वगळता उर्वरित 50 ग्राम पंचायतीसाठी 146 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. 21105 पुरुष मतदार, 19316 स्त्री मतदार व 0 1 असे एकुण मतदार 40422 होते. यापैकी 70% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचा अंदाज आहे. निवडणूकीकरिता क्षेत्रीय अधिकारी 9, मतदान केंद्राध्यक्ष 179, मतदान अधिकारी एक 179, मतदान अधिकारी दोन 185 व मतदान अधिकारी तीन 185 असे राखीव सह 728 कर्मचारी नियुक्त करण्यात


निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी 1, पोलिस निरिक्षक 1, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उप निरिक्षक 19 पोलिस अंमलदार 183 व होमगार्डस् 260 असा तगडा पोलिस बंदोबस्त उप विभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांनी लावला होता.


आले होते. या सर्वांना मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी संगणक सहायक तथागत पाटील यांच्या साथीने पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन द्वारे निवडणूक प्रशिक्षण दिले होते. तसेच मास्टर ट्रेनर मल्लिकार्जून स्वामी यांनी रमेश मुनेश्वर यांच्या साथीने मतदान यंत्रांची माहिती दिली होती. तसेच सर्व मास्टर ट्रेनर यांनी मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण गजानन मंदिर परिसरात नुकतेच निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफीक यांच्या नेतृत्वात व्ही. टी. सूर्यवंशी, एन.जी. कानगुले, विश्वास फड यांनी निवडणूकी करिता उपलब्ध केलेली 146 नियंत्रण संच व 193 मतदान यंत्रे स्विकारली, नायब तहसिलदार अनिता कोलगणे यांच्या नेतृत्वात अव्वल कारकून, महसूल सहायक, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, शिपाई यांनी इतर महत्वाचे साहित्य स्विकारले. वाहन कक्ष प्रमुख प्रकाश टारपे व देवकते यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस 11, स्कूल बस 5, कुझूर 9 व शासकीय जीप 7 अशी वाहन व्यवस्था केली होती. गोविंद पांपटवार व पी.पी. सूर्यवंशी यांनी अल्पोपहार व चहा-पाणी याची उत्कृष्ट व्यवस्था केली. अब्दुल फारुख यांनी मतदान केंद्राकरिता कंपार्टमेंट स्विकारले. निवडणूक विभागाचे नितीन शिंदे यांनी सर्व साहित्य व संदीप पाटील यांनी सर्व मनुष्यबळ पुरविले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...