Skip to main content

५० ग्रामपंचायतीचे भवितव्य ईव्हियम यंत्रात बंद ,७०% मतदान झाले

 



किनवट : रविवारी (दि.18 ) तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी 146 मतदान केंद्रावर निवडणूक लढविणाऱ्या सरपंच पदाच्या 137 व सदस्य पदाच्या एकूण 722 उमेदवारांचं भवितव्य अंदाजे सत्तर टक्के मतदारांनी मतदान करून केलं मतदान यंत्रात बंद


सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी नेहा भोसले, भाप्रसे व निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी सकाळ पासून दिले होते.. तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित शांतपणे पार पडत असल्याचा अनुभव त्यांनी प्रत्यक्ष पाहणीत घेतला. बुधवार पेठ, शनिवार पेठ ही दोन गावे तसेच 07 सरपंच व 77 सदस्य बिनविरोध झालीत. सक्रुनाईक तांडा येथून एकही नामनिर्देशन दाखल झालं नाही. त्यामुळे ही तीन गावे वगळता उर्वरित 50 ग्राम पंचायतीसाठी 146 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. 21105 पुरुष मतदार, 19316 स्त्री मतदार व 0 1 असे एकुण मतदार 40422 होते. यापैकी 70% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचा अंदाज आहे. निवडणूकीकरिता क्षेत्रीय अधिकारी 9, मतदान केंद्राध्यक्ष 179, मतदान अधिकारी एक 179, मतदान अधिकारी दोन 185 व मतदान अधिकारी तीन 185 असे राखीव सह 728 कर्मचारी नियुक्त करण्यात


निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी 1, पोलिस निरिक्षक 1, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उप निरिक्षक 19 पोलिस अंमलदार 183 व होमगार्डस् 260 असा तगडा पोलिस बंदोबस्त उप विभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांनी लावला होता.


आले होते. या सर्वांना मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी संगणक सहायक तथागत पाटील यांच्या साथीने पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन द्वारे निवडणूक प्रशिक्षण दिले होते. तसेच मास्टर ट्रेनर मल्लिकार्जून स्वामी यांनी रमेश मुनेश्वर यांच्या साथीने मतदान यंत्रांची माहिती दिली होती. तसेच सर्व मास्टर ट्रेनर यांनी मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण गजानन मंदिर परिसरात नुकतेच निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफीक यांच्या नेतृत्वात व्ही. टी. सूर्यवंशी, एन.जी. कानगुले, विश्वास फड यांनी निवडणूकी करिता उपलब्ध केलेली 146 नियंत्रण संच व 193 मतदान यंत्रे स्विकारली, नायब तहसिलदार अनिता कोलगणे यांच्या नेतृत्वात अव्वल कारकून, महसूल सहायक, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, शिपाई यांनी इतर महत्वाचे साहित्य स्विकारले. वाहन कक्ष प्रमुख प्रकाश टारपे व देवकते यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस 11, स्कूल बस 5, कुझूर 9 व शासकीय जीप 7 अशी वाहन व्यवस्था केली होती. गोविंद पांपटवार व पी.पी. सूर्यवंशी यांनी अल्पोपहार व चहा-पाणी याची उत्कृष्ट व्यवस्था केली. अब्दुल फारुख यांनी मतदान केंद्राकरिता कंपार्टमेंट स्विकारले. निवडणूक विभागाचे नितीन शिंदे यांनी सर्व साहित्य व संदीप पाटील यांनी सर्व मनुष्यबळ पुरविले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला