Skip to main content

महापुरुषांचा सातत्याने अवमान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी, चंद्रकांत पाटील यांचा किनवट येथे तिव्र निषेध व राजीनाम्याची मागणी

 


तालुका प्रतिनिधी:-

बहुजन समाजाच्या जडण -घडणीत व समाज सुधारणेत ज्यांचा सिंहांचा वाटा आहे अशा महामानवांचा अवमान संविधानीक पदावर असलेल्या भगतसिंग कोश्यारी, भाजप मंत्री मंडळात उच्च शिक्षण मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्या कडुन सातत्याने जाणीव पुर्वक छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अवमान झाला या प्रकरणी  किनवट येथील शिव, फुले , शाहु, आंबेडकरी प्रेमी अनुयायां तर्फे जिजामाता चौकात तिव्र निदर्शने करण्यात आली तसेच अँट्रॉसीटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी केली तहसिल कार्यालय  , पो. उ. वि. कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना  निवेदन देण्यात आले या वेळी विनोद भरणे, विवेक ओंकार, अभय नगराळे, राजु शेळके, रवींद्र कांबळे, सुगत नगराळे, सचीन कदम पाटील,सुरेश मुनेश्वर, प्रविण गायकवाड, भिमराव पाटील,किशन परेकार, राजेश पाटील,सुगत भरणे, निखील कावळे,शुभम पाटील, अनिल साकपेल्लीवार, कापसे, गंगाधर मुनेश्वर, गंगाधर कदम, शुभम पाटील, आकाश सर्पे, आनंद कावळे, निवेदक कांनिदे, सम्राट सर्पे, सचिन कावळे, प्रशांत ठमके, सतीश कापसे, प्रतिक नगराळे, प्रमोद मुनेश्वर, निखील सर्पे, प्रशिक मुनेश्वर, विश्वजीत पाटील, अमर शिंदे, विनोद सी. भरणे, आदी विविध संघटनेचे  युवक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते तर सदरील निवेदनावर सुगत नगराळे, निखील कावळे, सतीश कापसे, आकाश सर्पे, स्वप्नील सर्पे, निखील सर्पे, संघर्ष घुले, अनिल कांबळे, प्रतिक नगराळे, सुरज कावळे, निखील ओकांर, लखन धुर्वे, सुरज भालेराव, सुरज कांबळे, अजय कांबळे, शुभम पाटील, ब्रंम्हानंद एडके, विशाल वाथपाडे, सुखबीर टाक, संजय चव्हाण, सागर कोरटलवार, विजय पाटील, सिद्धार्थ कांबळे, सुबोध परेकार, सागर कांबळे, सुमीत शेंद्रे, लक्ष्मण भवरे, वाठोरे, राम शंकधरे, गजानन सल्लेवाड, आनंद बलखंडे, दाऊ वाघमारे, गौरव भवरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.









Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला