Skip to main content

सहा दिवसीय कयाधु- पैनगंगा महोत्सव निमित्त बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक वकृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद


 

नांदेड, दि. १० (वार्ताहर)ः वक्तृत्व स्पर्धेला बोलणाऱ्या वक्त्यांची आणि श्रोत्यांची संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कोल्यास श्रोत्यांची भाषणे ऐकण्यास श्रोते येतील का हा आयोजकां समोरील सर्वात मोठा प्रश्न असतो. मात्र खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्यांदात आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेस आत्तापर्यंत अपेक्षेपेक्षा असा मोठा प्रतिसाद मिळाला आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य हेतुच विद्यार्थ्यांमधील वक्ता सदैव जागे राहावा असाच आहे. तो हेतु साध्य झाला असल्याचे वक्तव्य राजश्री पाटील यांनी येथे केले. 

खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.१०) किनवट येथील महात्मा जोतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून राजश्री पाटील बोलत होत्या.

याप्रसंगी तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, शहर प्रमुख सुरज सातूरवार, भाजपचे धरमसिंग राठोड,  अशोक नेमानिवार, माहूर उपतालुका प्रमुख हनुमंतराव मुंडे, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, मनोज तिरमनवार, शिवराज राघू मामा, पंढरीनाथ ठाकरे, युवासेना तालुकाप्रमुख अजय कदम, घनश्याम कऱ्हाळे, कपिल रेड्डी, चंद्रकांत जयभाये, भाऊराव राठोड, प्रा. सुरेश कटकमवार, सोनू माने, साई पलेपवाड, अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे, शेख अजीज, शेख अफसर, मोहसीन, गजानन जाधव, किनवट तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव, महात्मा जोतिबा फुले संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, प्राचार्य शुभांगी ठमके, यांची उपस्थित होती.

या कार्यक्रमास उपस्थितीत असलेल्या किनवटच्या तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांनी स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. वक्तृत्व स्पर्धे बद्दल पुढे बोलताना राजश्री पाटील म्हणाल्या की, खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भजन, किर्तन, प्रवचन सारखे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असते, त्यास श्रोत्यांना बोलावण्याची गरज पडली नसती, परंतु माझ्या मतदार संघातील तरुणवर्गास युवा पिढीच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, विचार त्यांच्या भावना समजुन घेण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेसारखे दुसरे उपसयुक्त माध्यम नाही. त्यामुळे आज या स्पर्धेस वक्ते आणि श्रोत्यांची संख्या मर्यादित वाटत असली तरी, पुढील वर्षी मात्र या वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी स्पर्धक आणि श्रोत्यांची संख्या मोठी असेल त्यासाठी मतदार संघ निहाय वक्तृत्व स्पर्धेची कार्यशाळा घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी अजय झरकर, किर्ती तगडपल्लेवार, पंकज मोरे यांनी परिक्षण केले, उत्तम कानिंदे यांनी सुत्रसंचलन केले, सुनिल गरड यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...