Skip to main content

सहा दिवसीय कयाधु- पैनगंगा महोत्सव निमित्त बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक वकृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद


 

नांदेड, दि. १० (वार्ताहर)ः वक्तृत्व स्पर्धेला बोलणाऱ्या वक्त्यांची आणि श्रोत्यांची संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कोल्यास श्रोत्यांची भाषणे ऐकण्यास श्रोते येतील का हा आयोजकां समोरील सर्वात मोठा प्रश्न असतो. मात्र खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्यांदात आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेस आत्तापर्यंत अपेक्षेपेक्षा असा मोठा प्रतिसाद मिळाला आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य हेतुच विद्यार्थ्यांमधील वक्ता सदैव जागे राहावा असाच आहे. तो हेतु साध्य झाला असल्याचे वक्तव्य राजश्री पाटील यांनी येथे केले. 

खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.१०) किनवट येथील महात्मा जोतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून राजश्री पाटील बोलत होत्या.

याप्रसंगी तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, शहर प्रमुख सुरज सातूरवार, भाजपचे धरमसिंग राठोड,  अशोक नेमानिवार, माहूर उपतालुका प्रमुख हनुमंतराव मुंडे, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, मनोज तिरमनवार, शिवराज राघू मामा, पंढरीनाथ ठाकरे, युवासेना तालुकाप्रमुख अजय कदम, घनश्याम कऱ्हाळे, कपिल रेड्डी, चंद्रकांत जयभाये, भाऊराव राठोड, प्रा. सुरेश कटकमवार, सोनू माने, साई पलेपवाड, अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे, शेख अजीज, शेख अफसर, मोहसीन, गजानन जाधव, किनवट तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव, महात्मा जोतिबा फुले संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, प्राचार्य शुभांगी ठमके, यांची उपस्थित होती.

या कार्यक्रमास उपस्थितीत असलेल्या किनवटच्या तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांनी स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. वक्तृत्व स्पर्धे बद्दल पुढे बोलताना राजश्री पाटील म्हणाल्या की, खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भजन, किर्तन, प्रवचन सारखे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असते, त्यास श्रोत्यांना बोलावण्याची गरज पडली नसती, परंतु माझ्या मतदार संघातील तरुणवर्गास युवा पिढीच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, विचार त्यांच्या भावना समजुन घेण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेसारखे दुसरे उपसयुक्त माध्यम नाही. त्यामुळे आज या स्पर्धेस वक्ते आणि श्रोत्यांची संख्या मर्यादित वाटत असली तरी, पुढील वर्षी मात्र या वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी स्पर्धक आणि श्रोत्यांची संख्या मोठी असेल त्यासाठी मतदार संघ निहाय वक्तृत्व स्पर्धेची कार्यशाळा घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी अजय झरकर, किर्ती तगडपल्लेवार, पंकज मोरे यांनी परिक्षण केले, उत्तम कानिंदे यांनी सुत्रसंचलन केले, सुनिल गरड यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.