Skip to main content

शाहरुख खानच्या जवान सिनेमाचे शूटिंग औरंगाबादेत, यंत्रणा पोहचली

 


सम्यक सर्पे 

औरंगाबाद :

हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी ‘जवान’ या सिनेमाचे चित्रीकरण (शूटिंग) बिडकीन येथील ‘डीएमआयसी’त होणार असून चित्रिकरणासाठी लागणारी सर्व यंत्रणा बिडकीन येथे पोहोचली आहे. चित्रपटातील काही साहसी दृष्यांचे (ॲक्शन सीन) येथे चित्रीकरण होणार असल्याची माहिती आहे.


अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा एक ॲक्शनपट असून जून २०२३ मध्ये तो रिलीज होणार आहे. सध्या हा सिनेमा सध्या निर्मिती प्रक्रियेत असून पुणे, हैदराबाद, मुंबई, चेन्नई येथे शूटिंग होणार आहे. मात्र, चित्रपटातील भरधाव गाड्यांचा थरार शूट करण्यासाठी या मेट्रो शहरात जागा नसल्याने औरंगाबाद नजीकच्या बिडकीनची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून शाहरुख खानच्या ‘रेड चिली प्रॉडक्शन’चे अधिकारी प्रयत्नशील होते. अखेर त्यांना चित्रिकरणासाठी परवानगी मिळाली असून सर्व यंत्रणा चित्रीकरणस्थळी पोहोचली आहे.


या शूटिंगसाठी शाहरुख खान येणार का, याबाबत साशंकता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘बॉडी डबल’च्या माध्यमातून ॲक्शन सीनचे शूटिंग करण्यात येणार असल्याचे समजते. परदेशातील काही ॲक्शन कलाकारही यात सहभागी होणार आहेत.


शाहरुख खानच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होत असल्याची माहिती मिळताच बिडकीन येथे बघ्यांनी एकच गर्दी केली. मात्र, अद्याप शूटिंग सुरू नसल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. गर्दीला आवर घालण्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शूटिंग खूप आतमध्ये असल्याने डीएमआसीतील सर्व अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत.



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...