Skip to main content

राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा भारताच्या इतिहासातीलसर्वात मोठी यात्रा ठरावी- नानाभाऊ पटोले यांचे रेणुका देवीला साकडे

 


माहुर प्रतिनिधी:-

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आज रविवारी दुपारी 12 वाजता माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात दर्शन घेऊन आरती केली व राहुल गांधी यांची भारत जोडा पदयात्रा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी यात्रा ठरावी यासाठी नानाभाऊ पटोले यांनी रेणुका मातेला साखडे घातले

           दिनांक 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यातून जाणार आहे याकरिता राज्यातील सर्वच नेते सध्या नांदेड मुक्कामी असून दरम्यान आज दिनांक 6 रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माहूर गडावरील माता रेणुकाच्या दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले व आरती केली यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव परविन शेख व किनवटचे उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अभय महाजन यांनी त्यांचे स्वागत केले व  भारत जोडो पदयात्रेविषयी  चर्चा केली यावेळी किनवट तालुक्याचे  महिला तालुका अध्यक्ष  शेख शहेनाज माहूरचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र केशवजी व तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय भाऊ राठोड  माहूर शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे  माजी नगरपालिका उपाध्यक्ष सौ अश्विनी आनंद तुगदाळे तालुका अध्यक्ष महिला कविता राजू सावदलकर व युवा  फारुख चव्हाण  गिरीश नेमानेवार युवक उपाध्यक्ष जवाद आलम  काँग्रेसचे पदाधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...