Skip to main content

जे .एल. जी. व बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहे - एकनाथजी शिंदे यांचे प्रतिपादन

 


( ता. प्र. किनवट) ता.१९


जे.एल.जी. व बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण व तालुक्यातील  महीला सक्षम होत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा अग्रणी बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक मा. एकनाथजी शिंदे यांनी केले .

(राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बँक नार्बाडपुरस्कृत) गृहलक्ष्मी महीला ग्राम विकास संस्था किनवट व महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या वतीने घोटी येथे आयोजित संयुक्त क्रार्यक्रमात  ते बोलत होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून किनवटच्या  प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मा. नेहाजी भोसले  (IAS) हे होते तर मंचावर प्रमुख उपस्थिती किनवट महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा व्यवस्थापक रुपेशजी दलाल, बोधडी एम जी बी शाखेचे व्यवस्थापक श्री. चांदेकर , सौ. संगीता पाटील संस्था अध्यक्षा गृहलक्ष्मी महिला ग्राम विकास संस्था किनवट- माहुर हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरवातीस महीलांनी स्वागत गीत सादर केले   कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगिता पाटील यांनी मांडले व संस्थेची कारकीर्द सांगीतली , या नंतर रुपेश दलाल यांनी महीलांना बँके व्यवहार  संबधी माहिती दिली तसेच एम जी बी  बँके  सेवा केंद्रातर्फे जाग्यावर  नवीन खाते उघडुन देण्यात आले .

या नंतर ४ जे. एल .जी. , बोधडी शाखेचे बचत गटांना , व ३५ एस. एच. जी. बचता गटांना अशा एकुण ३९ महिला बचत गटास शेळी पालन उद्योगा करीता ८०लाखांचे कर्ज मा. सहायक जिल्हाधिकारी नेहाजी भोसले व मा.एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मानंद सत्यवंश यांनी केले तर आभार प्रदर्शन माया सिसले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुचीता फुलझेले, बालाजी वानखेडे, संकेत वंजारे, अनिकेत वानखेडे, राजेश पाटील यांनी प्रयत्न केले या क्रार्यक्रमासाठी किनवट व माहुर तालुक्यातील हजारो महिला उपस्थित होत्या .

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...