Skip to main content

जे .एल. जी. व बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहे - एकनाथजी शिंदे यांचे प्रतिपादन

 


( ता. प्र. किनवट) ता.१९


जे.एल.जी. व बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण व तालुक्यातील  महीला सक्षम होत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा अग्रणी बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक मा. एकनाथजी शिंदे यांनी केले .

(राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बँक नार्बाडपुरस्कृत) गृहलक्ष्मी महीला ग्राम विकास संस्था किनवट व महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या वतीने घोटी येथे आयोजित संयुक्त क्रार्यक्रमात  ते बोलत होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून किनवटच्या  प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मा. नेहाजी भोसले  (IAS) हे होते तर मंचावर प्रमुख उपस्थिती किनवट महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा व्यवस्थापक रुपेशजी दलाल, बोधडी एम जी बी शाखेचे व्यवस्थापक श्री. चांदेकर , सौ. संगीता पाटील संस्था अध्यक्षा गृहलक्ष्मी महिला ग्राम विकास संस्था किनवट- माहुर हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरवातीस महीलांनी स्वागत गीत सादर केले   कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगिता पाटील यांनी मांडले व संस्थेची कारकीर्द सांगीतली , या नंतर रुपेश दलाल यांनी महीलांना बँके व्यवहार  संबधी माहिती दिली तसेच एम जी बी  बँके  सेवा केंद्रातर्फे जाग्यावर  नवीन खाते उघडुन देण्यात आले .

या नंतर ४ जे. एल .जी. , बोधडी शाखेचे बचत गटांना , व ३५ एस. एच. जी. बचता गटांना अशा एकुण ३९ महिला बचत गटास शेळी पालन उद्योगा करीता ८०लाखांचे कर्ज मा. सहायक जिल्हाधिकारी नेहाजी भोसले व मा.एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मानंद सत्यवंश यांनी केले तर आभार प्रदर्शन माया सिसले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुचीता फुलझेले, बालाजी वानखेडे, संकेत वंजारे, अनिकेत वानखेडे, राजेश पाटील यांनी प्रयत्न केले या क्रार्यक्रमासाठी किनवट व माहुर तालुक्यातील हजारो महिला उपस्थित होत्या .

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...