Skip to main content

किनवट नगर परिषदेसाठी तयार केलेला विकास ड्राफ्ट प्रसिद्ध करावा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची मागणी

 


किनवट शहर बातमीदार:-


किनवट नगर परिषदेसाठी तयार केलेल्या विकास योजनेचेचा ड्राफ्ट हा शहरातील नागरीकांकरिता अवलोक, सुचना, हरकती करिता प्रसिध्द करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी नगर परिषद किनवट यांना सादर केले आहे.


किनवट शहराचा विकास योजनेचा ड्राफ्ट हा संचालक नगर रचना नदिड यांनी दिनांक ११ रोजी किनवट नगर परिषदेला पाठवले आहे. परंतु प्राप्त झालेला ड्राफ्ट अद्यापही किनवट शहरातील स्टेक होल्डरच्या अवलोकनार्थ तथा सुचना व हरकती करिता प्रसिध्द करणे आवश्यक असतो तसा नियम हि आहे. परंतु नियमांच्या पायमल्ली करिता प्रचलित असलेल्या किनवट नगर परिषदे करिता हि


बाब नित्याचीच झालेली आहे. त्यामुळे कोणतेहि काम नियमांने होत नाही. येथिल लोकप्रतिनिधींचे नियंत्रण कर्मचा-यावर मोठा गाजावाजा करुन निवडणुक लढवून आलेले लोकप्रतिनिधी हे गेल्या पाच वर्षात निष्क्रिय ठरले असुन त्यांचा कोणत्याही प्रकारचा नियंत्रण नसल्याने अशा प्रकारे शहरातील नागरीकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे असा आरोप यावेळी कॉंग्रेस पक्षाकडुन करण्यात आला आहे.


भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणिस गिरिष नेम्मानिवार यांनी यावेळी नगर परिषदेस् खुलासा सादर करण्याचे आवाहन केले आहे अन्यथा सदर प्रकरणी न्याय मिळवण्याकरिता मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे धाव घेण्यात येणार असल्याचे नेम्मानिवार यांनी सांगितले आहे.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सादर केलेल्या निवेदनावर कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नाही, सुर्यकांत रेड्डी, सरचिटणिस गिरिष नेम्मानिवार, युवक अध्यक्ष आशिष क-हाळे पाटील, इश्वर चव्हान, वसंत राठोड, जवाद आलम, शेख शादुल्ला, स्वामी नुतपेल्लीवार यांच्या स्वाक्ष-या आहेत तर निवेदन सादर करतांना उपस्थित देखिल होते. नगर परिषद कार्यालयात निवेदन स्विकारण्याकरिता कर्मचा-यांची उपस्थिती नसल्याने उपस्थितांनी गैरकारभारावर संताप व्यक्त केला आहे. ऐन वेळी कर्मचा-यांना बोलावुन निवेदन द्यावे लागल्याने नगर परिषदेची काय अवस्था आहे व वरिल प्रकार हा संतापजनक आहे असे माध्यमांशी बोलतांना कॉंग्रेसचे सरचिटणिस गिरिष नेम्मानिवार यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला