Skip to main content

सारंग वाकोडीकर यांचा खासदार हेमंत पाटील यांच्यावतीने गौरव

 


 


किनवट : येथील सेट ट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर , यांचा "महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2022" तसेच 'महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा' दरम्यान मुंबई येथे  पार पडलेल्या विजेता सन्मान सोहळ्यात  मा. राज्यपाल यांचे हस्ते सन्मानित झाल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी त्यांचा गौरव केला आहे.

          महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित "महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2022" तसेच 'महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा' राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे दि.१६.१०.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता  पार पडलेल्या विजेता सन्मान सोहळ्यात त  मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सुप्रसिद्ध वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत  आपणास सन्मानीत करण्यात आले होते.

             हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सारंग वाकोडीकर या धडपडणाऱ्या युवकांचा सन्मान झाल्याबद्दल खासदार हेमंत पाटील व गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्रीताई हेमंत पाटील यांनी आपल्या विधानसभा संपर्क कार्यालयात बोलावून जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांचे हस्ते अभिनंदन पत्र देऊन गौरव केला व भ्रमणधनीद्वारे संवाद साधून कौतुक केले.


Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...