Skip to main content

कॉस्मापॉलिटन विद्यालयामुळे विद्यार्थ्यांना मिळाली सुर्यग्रहण पाहण्याची संधी.

 


किनवट:(तालूका प्रतिनिधी) 

         कॉस्मापॉलिटन विद्यालय किनवटमुळे सुर्यग्रहण पाहण्याची संधी येथील विद्यार्थ्यी, पालक व  नागरिकांना मिळाली.  शाळेतील सहशिक्षक बाळकृष्ण कदम यांनी

दि. 25  रोजी सांय 5 च्या नंतर सूर्यग्रहणाचे निरीक्षण करून  खंडग्रास सूर्यग्रहणा विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या वेळी सुर्यग्रहण पाहण्यासाठी सौर फिल्टरचा वापर करण्यात आला.

         किनवट शहरातील कॉस्मापॉलिटन विद्यालयाने प्रथमतः संगणक प्रयोग शाळेतून प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना सुर्यग्रहण कशा पद्धतीने घडते या विषयी चित्रफित दाखवून माहिती दिली. यामुळे विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांना वैज्ञानिक माहीती मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते.



 कॉस्मापॉलिटन विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना खगोलीय घटनेचा अभ्यास व्हावा यासाठी सुर्यग्रहण पाहण्यासाठी सौर फिल्टरची व्यवस्था केलेली होती. ग्रहण पाहण्यासाठी अनेक विद्यार्थी सुट्टी असतांना सुद्धा शाळेत उपस्थित होते हे विशेष. तर परिसरातील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान 4 वाजून 58 मिनिटांनी सूर्यग्रहणास सुरवात झाली. जस-जसा वेळ पुढे सरकत होता तस-तशी सुर्यग्रहण पाहण्यासाची उत्सुकता वाढत होती. विद्यालयाच्या छतावर शाळेतील विद्यार्थ्यी, पालका, परिसरातील नागरिकांनी सूर्यग्रहण पहाण्याचा आनंद लुटला. जवळपास 1 तास एवढ्या कालावधीत हे सूर्यग्रहण चालले.  या वेळी  संस्थेचे सचिव पी व्ही रामतिर्थकर, अध्यक्ष एन. व्ही रामतिर्थकर, मुख्याध्यापक रावसाहेब घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक रमेश बारापात्रे , सहशिक्षक बाळकृष्ण कदम, राजू बोलेनवार, सेवक प्रकाश हुलकाने आदींनी परिश्रम घेत. दिवाळीच्या सुट्यात शालेय विद्यार्थीसांठी  सूर्यग्रहण पाहण्याचा कार्यक्रम आयोजित करणारी किनवट तालुक्यातील कॉस्मापॉलिटन विद्यालय कदाचीत एकमेव शाळा असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला