Skip to main content

कॉस्मापॉलिटन विद्यालयामुळे विद्यार्थ्यांना मिळाली सुर्यग्रहण पाहण्याची संधी.

 


किनवट:(तालूका प्रतिनिधी) 

         कॉस्मापॉलिटन विद्यालय किनवटमुळे सुर्यग्रहण पाहण्याची संधी येथील विद्यार्थ्यी, पालक व  नागरिकांना मिळाली.  शाळेतील सहशिक्षक बाळकृष्ण कदम यांनी

दि. 25  रोजी सांय 5 च्या नंतर सूर्यग्रहणाचे निरीक्षण करून  खंडग्रास सूर्यग्रहणा विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या वेळी सुर्यग्रहण पाहण्यासाठी सौर फिल्टरचा वापर करण्यात आला.

         किनवट शहरातील कॉस्मापॉलिटन विद्यालयाने प्रथमतः संगणक प्रयोग शाळेतून प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना सुर्यग्रहण कशा पद्धतीने घडते या विषयी चित्रफित दाखवून माहिती दिली. यामुळे विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांना वैज्ञानिक माहीती मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते.



 कॉस्मापॉलिटन विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना खगोलीय घटनेचा अभ्यास व्हावा यासाठी सुर्यग्रहण पाहण्यासाठी सौर फिल्टरची व्यवस्था केलेली होती. ग्रहण पाहण्यासाठी अनेक विद्यार्थी सुट्टी असतांना सुद्धा शाळेत उपस्थित होते हे विशेष. तर परिसरातील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान 4 वाजून 58 मिनिटांनी सूर्यग्रहणास सुरवात झाली. जस-जसा वेळ पुढे सरकत होता तस-तशी सुर्यग्रहण पाहण्यासाची उत्सुकता वाढत होती. विद्यालयाच्या छतावर शाळेतील विद्यार्थ्यी, पालका, परिसरातील नागरिकांनी सूर्यग्रहण पहाण्याचा आनंद लुटला. जवळपास 1 तास एवढ्या कालावधीत हे सूर्यग्रहण चालले.  या वेळी  संस्थेचे सचिव पी व्ही रामतिर्थकर, अध्यक्ष एन. व्ही रामतिर्थकर, मुख्याध्यापक रावसाहेब घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक रमेश बारापात्रे , सहशिक्षक बाळकृष्ण कदम, राजू बोलेनवार, सेवक प्रकाश हुलकाने आदींनी परिश्रम घेत. दिवाळीच्या सुट्यात शालेय विद्यार्थीसांठी  सूर्यग्रहण पाहण्याचा कार्यक्रम आयोजित करणारी किनवट तालुक्यातील कॉस्मापॉलिटन विद्यालय कदाचीत एकमेव शाळा असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...