Skip to main content

कॉस्मापॉलिटन विद्यालयामुळे विद्यार्थ्यांना मिळाली सुर्यग्रहण पाहण्याची संधी.

 


किनवट:(तालूका प्रतिनिधी) 

         कॉस्मापॉलिटन विद्यालय किनवटमुळे सुर्यग्रहण पाहण्याची संधी येथील विद्यार्थ्यी, पालक व  नागरिकांना मिळाली.  शाळेतील सहशिक्षक बाळकृष्ण कदम यांनी

दि. 25  रोजी सांय 5 च्या नंतर सूर्यग्रहणाचे निरीक्षण करून  खंडग्रास सूर्यग्रहणा विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या वेळी सुर्यग्रहण पाहण्यासाठी सौर फिल्टरचा वापर करण्यात आला.

         किनवट शहरातील कॉस्मापॉलिटन विद्यालयाने प्रथमतः संगणक प्रयोग शाळेतून प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना सुर्यग्रहण कशा पद्धतीने घडते या विषयी चित्रफित दाखवून माहिती दिली. यामुळे विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांना वैज्ञानिक माहीती मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते.



 कॉस्मापॉलिटन विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना खगोलीय घटनेचा अभ्यास व्हावा यासाठी सुर्यग्रहण पाहण्यासाठी सौर फिल्टरची व्यवस्था केलेली होती. ग्रहण पाहण्यासाठी अनेक विद्यार्थी सुट्टी असतांना सुद्धा शाळेत उपस्थित होते हे विशेष. तर परिसरातील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान 4 वाजून 58 मिनिटांनी सूर्यग्रहणास सुरवात झाली. जस-जसा वेळ पुढे सरकत होता तस-तशी सुर्यग्रहण पाहण्यासाची उत्सुकता वाढत होती. विद्यालयाच्या छतावर शाळेतील विद्यार्थ्यी, पालका, परिसरातील नागरिकांनी सूर्यग्रहण पहाण्याचा आनंद लुटला. जवळपास 1 तास एवढ्या कालावधीत हे सूर्यग्रहण चालले.  या वेळी  संस्थेचे सचिव पी व्ही रामतिर्थकर, अध्यक्ष एन. व्ही रामतिर्थकर, मुख्याध्यापक रावसाहेब घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक रमेश बारापात्रे , सहशिक्षक बाळकृष्ण कदम, राजू बोलेनवार, सेवक प्रकाश हुलकाने आदींनी परिश्रम घेत. दिवाळीच्या सुट्यात शालेय विद्यार्थीसांठी  सूर्यग्रहण पाहण्याचा कार्यक्रम आयोजित करणारी किनवट तालुक्यातील कॉस्मापॉलिटन विद्यालय कदाचीत एकमेव शाळा असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...