Skip to main content

शहर व परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

 



किनवट,दि.५ : शहर व परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन आज(दि.५) उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतयाजवळ मुख्य कार्यक्रम झाला.ध्वजवंदन प्राचार्य राजाराम वाघमारे यांच्या हस्ते झाले. सामुहिक वंदना महेंद्र नरवाडे,सुरेश पाटील,प्रा.सुभाष गडलिंग व गंगाधर कदम यांनी घेतली. याठिकाणी शहर व परिसरातील बौद्ध बांधव, भगिनी मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.यात विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.


   शहरातील सिद्धार्थ नगरातील   जेतवन बुद्ध विहारात आज(दि.५) प्रियदर्शी सम्राट अशोक विजयादशमी तसेच ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यातआला.बौद्ध संस्कार विधी  प्रा.सुबोध सर्पे,प्रा.सुभाष गडलिंग व भारतीय बौध्द महासभाचे जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे यांनी घेतला.पंचरंगी ध्वजारोहण प्राचार्य राजाराम वाघमारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी दादाराव कयापाक, नगरसेवक श्रीनिवास नेम्मानिवार, नितिन कावळे,सुरेश जाधव,माधव कावळे,वसंत सर्पे, गंगाधर कावळे,प्रकाश पाटील,यादव नगारे,प्रा.रविकांत सर्पे, उपप्राचार्य राऊत, आत्मानंद सोनकांबळे,अॅड.मिलिंद सर्पे,राजेश पाटील,शिलरत्न पाटील,मनोहर पाटील,यादव नगारे यांच्यासह उपासिका,बालके आदि उपस्थित होते.यशस्वितेसाठी निखिल कावळे,अॅड.सम्राट सर्पे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

  गोकुंदा (ता.किनवट)येथिल विद्यानगरात प्रा.एस.डी.वाठोरे यांच्या हस्ते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात धम्मसेवक खंडूजी मुनेश्वर यांच्या हस्ते, राजर्षी शाहू नगरात प्रा.सुभाष गडलिंग यांच्या हस्ते, वैशाली नगरात बुद्धभूषण मुनेश्वर यांच्या हस्ते,तर सिद्धार्थ नगरातील गंधकुटी बुद्ध विहारात नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्या निर्मला वसंत कांबळे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...