Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिलाध्यक्षा डॉ.सुधाताई कांबळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय स्तरावरचा आणाभाऊ साठे सामाजभूषण पुरस्कार प्रदान

 


मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती पर्व, दिल्ली लोकशाहीर जनकल्याण समिती, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई हरीश कांबळे यांना राष्ट्रीय स्तरावरचा अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री विनय सहस्रबुदधे, डॉ. शिवलिग शिवाचार्य महाराज, अशोक मेंढे, माजी आमदार राम गुंडीले, संयोजन समितीचे मुख्य सचिव विक्रम सोळसे, अध्यक्ष विशवनाथ सदामते, शारदा डोलारे, दिलीप सोळसे, केशव सरवदे, मधुकर सोनवणे, कमलेश गायकवाड अविनाश महातेकर आदी मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...