Skip to main content

शिक्षणाचा मांडला बाजार




 किनवट: १३हजार रुपये प्रवेश शुल्क भरून प्रवेश घ्या, प्रशिक्षण घेण्याची गरज नाही,परीक्षाही नाममात्रच होईल व एका वर्षानंतर पदविका प्रमाणपत्र तुमच्या हाती देण्यात येईल,असा शिक्षणाचा बाजार मांडण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून गोकुंदा(ता किनवट)येथे कार्यालय असलेल्या गोपीनाथ मुंडे आय.टी.आय.प्रशिक्षण संस्थेने मांडला आहे.फक्त कागदोपत्री प्रशिक्षित प्रशिक्षणार्थि विद्यार्थी तयार करून एकप्रकारे शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या सदरील संस्थेची मान्यता संबंधितांनी रद्द करून संस्था चालकांना कोठडीची हवा दाखवावी,अशी मागणी किनवट या आदिवासी तालुक्यातील अनेक जागृत पालकांनी केली आहे.

     गोपीनाथ मुंडे आय.टी.आय.प्रशिक्षण संस्थेमार्फत गोकुंदा येथे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर चालविण्यात येते.या सेंटरमध्ये १० वी व १२वी पास विद्यार्थ्यांसाठी पुर्णवेळ असलेला एक वर्षाचा वायरमन - प्रवेश क्षमता २५ व बांधकाम पर्यवेक्षक - प्रवेश क्षमता ५०, असे दोन मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रम आहेत.

    या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुल्क घेऊन प्रवेश देण्यात येतो.यानंतर मात्र त्यांना प्रशिक्षित पुर्ण करण्याची गरज नसते.क्रमिक पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येतात.त्याचा अभ्यास त्यांनी वर्षभर घरी राहूनच करावा.नंतर शासकीय आय.टी.आय.मध्ये वार्षिक परिक्षा होते.परंतु, या परीक्षेची चिंता करण्याची गरज नाही,परीक्षा या अर्थपुर्ण व्यवहारातून मेनेज केल्या जातात, असे विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत सांगीतल्या जाते,हे विशेष आहे.

    राज्यातील बहुजन समाजाचे शक्तीशाली नेते राहीलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या नावे असलेल्या प्रशिक्षण संस्थेतून बहुजन विद्यार्थ्यांना बोगस प्रशिक्षण देऊन त्यांची व शासनाची फसवणूक करणाऱ्या संस्था चालकाबदल वंजारी समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.ही बाब आपण पंकजा मुंडे यांच्या कानावर घालणार असल्याचे समाजाच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितले.

  या प्रकरणी संस्था चालकाकडून अधिक माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवत होता.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.