Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंध व अपंग आश्रमात साजरा पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले होते आयोजन



 पिंपरी चिंचवड, पुणे: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने स्वातंत्र्य दिन अजिंठा येथील अंध व अपंग आश्रमाला भेट देऊन साजरा केला. आश्रमाचे संस्थापक सुनील चोराडिया, सामाजिक कार्यकर्ते शहाजी नायर यांचा सन्मान करण्यात आला.

 यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोषाध्यक्ष राजेश शिंदे यांचा वाढदिवस आश्रमातील अंध व अपंग बांधवासोबत केक कापून साजरा केला.

 यावेळी अंध व अपंग बांधवांनी देशभक्तीपर गीते गाऊन वातावरण निर्मिती केली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने अंध अपंग बांधवांना अल्पोपहार देऊन त्यांच्यासोबत वार्तालाप करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शहाजी नायर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष राजन नायर, पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष रणसिंग, महिला शहराध्यक्षा मंदा बनसोडे, शहर उपाध्यक्षा उषा लोखंडे, सहसचिव निर्मला जोगदंड, कोषाध्यक्ष राजेश शिंदे, सदस्य किशोर सुर्यवंशी आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.



यावेळी अंध व अपंग आश्रम संचालक सुनिल चोरडिया यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र अंध अपंगांसाठी समाजातून तसेच स्वतःच्या घरातून केले जाणारे दुर्लक्ष याविषयीची खंत चोरडिया यांनी व्यक्त केली. तसेच सरकारने अंध अपंगांच्या प्रवासासाठी बी आर टी ने अवलंबलेल्या नवीन मार्गामुळे अंध अपंग व वृद्ध यांना सरकारने डावलून त्यांचे नुकसान किंवा गैरसोय केल्याबद्दलची खंत चोरडिया यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने ७५ वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंध अपंग बांधवांसोबत साजरा केल्याने संघाचे कौतुक केले व आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...