Skip to main content

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या १४ व्या वर्धापण दिना निमित्त वृक्षारोपण समारोह

 


(किनवट तालुका बातमीदार)
ता.२० बुधवार

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या १४ व्या वर्धापण दिना निमित्त  बळीराम पाटील कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने किनवट येथे वृक्षारोपण समारोह घेण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक रुपेश दलाल यांनी केली होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मा.कीर्तीकिरण एच. पूजार हे होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथींचे सत्कार करण्यात आले
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच. पूजार यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या गौरवशाली वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या व वृक्षारोपण उपक्रमा बद्दल कौतुकही केले आणि आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा यांची माहिती दिली.
तर रुपेश दलाल यांनी बँकेच्या कारकीर्दी बद्दल माहीती सांगीतली त्यांनी म्हटले सोळा जिल्ह्यात एम जी बी शाखा कार्यरत आहे या बँकेद्वारे गृहकर्ज,शैक्षणिक कर्ज,व्यवसायिक कर्ज ,विमा योजना या दिल्या जातात.
यानंतर महाविद्यालयीन परिसरात  मा.पूजार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर,उप प्राचार्य डॉ. गजानन वानखेडे,सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .आनंद भंडारे,प्रा.द्वारकाप्रसाद वायाळ, प्रा.मार्तंड कुलकर्णी , एनजीओ संगीता पाटील,पत्रकार गोकुळ भवरे ,राजेश पाटील
ब. पा. महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील, य. च. मुक्त विद्यापिठाचे संयोजक प्रा. शिवदास बोकडे, सुरज आढागळे,प्रा.योगेश सोमवंशी, प्रा.सुलोचना जाधव प्रा.डॉ.शुभांगी दिवे, प्रा.मंदाकिनी राठोड, प्रा,लता पेंडलवाड, प्रा.धात्रक, प्रा.काझी प्रा..एस.आर .शिंदे , प्रा.स्वाती कुरमे तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी स्टाफ अधिकारी प्रितेश लोटे, राहुल दवने, मारोती पेंदोर, भीकुसींग चव्हाण, सुनिल राठोड, कस्तुरवार, संकेत वंजारे,बालाजी वानखेडे आदि मान्यवर उपस्थित होतं
 या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.पुरूषोत्तम येरडलवार यांनी केले तर आभार प्रल्हाद जाधव यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...