Skip to main content

महावितरणचा भोंगळ कारभार, दोन दिवसापासुन मांडवी कोठारी सिंद. गाव अंधारात

 



किनवट/ मांडवी प्रतिनिधी:-

ता.30

 

मांडवी जिल्हा परिषद गटाअंतर्गत कोठरी सिंध या गावात मागील काही दिवसापासून वीज ही वारंवार खंडित होत होती.पण दोन दिवसापूर्वी गावात वीज बिल थकीत आहे व गावातील ग्रामपंचायतीची वीज बिल ही मागिल काही महिन्या पासुन थकीत आहे कारण ओला दुष्काळ  आहे शेतकरी त्रस्त आहे त्यामुळे गावातील विज बिल भरले जात नाही या कारणाने दिनांक 29/7/2022शुक्रवार या दिवशी सकाळ पासुन वीज पुरवठा खंडित केला आहे तो गावातील वीज बिल पूर्णपणे वसूल केल्यावर ती वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. अशा तुलघी  कारभरामुळे कोठारीवासी हवालदील झाले आहे. 

मांडवी परिसरात मागील काही  दिवसापासून  अतिवृष्टी असून शेतामध्ये पूर्ण पाणी साचले असून शेतकरी वर्ग पूर्णपणे घरी बसलेला असून काही मजुरांना मजुरी लागत नसल्यामुळे अशा परिस्थिती वीज बिल भरणे शेतकरी व मोल मजुरी करणारे गावकरी यांनाअशक्य आहे. ग्रामपंचायतीत प्रशासकीय कारभार असल्याने बिल काडण्यास वेळ लागत आहे कारण ग्रामपंचायीकडे या पूर्वी  कोणतीही नोटिस किंवा  पत्र देण्यात आले नाही पुर्व सुचना न देताच विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला व गावकऱ्यांना वीज वापरताना मीटर बसविणे व नियमित बिल भरणे या साठी जनजागृती गावात केली गेली नाही व गावकऱ्यांना बिलभरा नाहीतर गावातील वीज पुरवठा खंडित केला जाईल असे ग्रामपंचायत  येथे सभा घेऊन गावकऱ्यांना सूचना देण्यात आली नाही. व असे अचानक गावाची वीज पुरवठा खंडित केला जात आहे.पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये  ओला दुष्काळ पडलेला असून शेतकऱ्याकडे सध्या आर्थिक परिस्थिती बेताची असून मांडवी परिसरातील महा वितरण कार्यालयाचे बेजबाबदार कारभाराचे शासनाने तात्काळ लक्ष देऊन कोठारी सिंध या गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी तेथील सर्व  गावकरी करीत  येत आहे विशेष बाब म्हणजे कोठारी येथे आरोग्य शिबीर सुरू आहे व शस्त्रक्रिया सुरू आहे गावात .

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते