Skip to main content

महावितरणचा भोंगळ कारभार, दोन दिवसापासुन मांडवी कोठारी सिंद. गाव अंधारात

 



किनवट/ मांडवी प्रतिनिधी:-

ता.30

 

मांडवी जिल्हा परिषद गटाअंतर्गत कोठरी सिंध या गावात मागील काही दिवसापासून वीज ही वारंवार खंडित होत होती.पण दोन दिवसापूर्वी गावात वीज बिल थकीत आहे व गावातील ग्रामपंचायतीची वीज बिल ही मागिल काही महिन्या पासुन थकीत आहे कारण ओला दुष्काळ  आहे शेतकरी त्रस्त आहे त्यामुळे गावातील विज बिल भरले जात नाही या कारणाने दिनांक 29/7/2022शुक्रवार या दिवशी सकाळ पासुन वीज पुरवठा खंडित केला आहे तो गावातील वीज बिल पूर्णपणे वसूल केल्यावर ती वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. अशा तुलघी  कारभरामुळे कोठारीवासी हवालदील झाले आहे. 

मांडवी परिसरात मागील काही  दिवसापासून  अतिवृष्टी असून शेतामध्ये पूर्ण पाणी साचले असून शेतकरी वर्ग पूर्णपणे घरी बसलेला असून काही मजुरांना मजुरी लागत नसल्यामुळे अशा परिस्थिती वीज बिल भरणे शेतकरी व मोल मजुरी करणारे गावकरी यांनाअशक्य आहे. ग्रामपंचायतीत प्रशासकीय कारभार असल्याने बिल काडण्यास वेळ लागत आहे कारण ग्रामपंचायीकडे या पूर्वी  कोणतीही नोटिस किंवा  पत्र देण्यात आले नाही पुर्व सुचना न देताच विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला व गावकऱ्यांना वीज वापरताना मीटर बसविणे व नियमित बिल भरणे या साठी जनजागृती गावात केली गेली नाही व गावकऱ्यांना बिलभरा नाहीतर गावातील वीज पुरवठा खंडित केला जाईल असे ग्रामपंचायत  येथे सभा घेऊन गावकऱ्यांना सूचना देण्यात आली नाही. व असे अचानक गावाची वीज पुरवठा खंडित केला जात आहे.पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये  ओला दुष्काळ पडलेला असून शेतकऱ्याकडे सध्या आर्थिक परिस्थिती बेताची असून मांडवी परिसरातील महा वितरण कार्यालयाचे बेजबाबदार कारभाराचे शासनाने तात्काळ लक्ष देऊन कोठारी सिंध या गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी तेथील सर्व  गावकरी करीत  येत आहे विशेष बाब म्हणजे कोठारी येथे आरोग्य शिबीर सुरू आहे व शस्त्रक्रिया सुरू आहे गावात .

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...