Skip to main content

महावितरणचा भोंगळ कारभार, दोन दिवसापासुन मांडवी कोठारी सिंद. गाव अंधारात

 



किनवट/ मांडवी प्रतिनिधी:-

ता.30

 

मांडवी जिल्हा परिषद गटाअंतर्गत कोठरी सिंध या गावात मागील काही दिवसापासून वीज ही वारंवार खंडित होत होती.पण दोन दिवसापूर्वी गावात वीज बिल थकीत आहे व गावातील ग्रामपंचायतीची वीज बिल ही मागिल काही महिन्या पासुन थकीत आहे कारण ओला दुष्काळ  आहे शेतकरी त्रस्त आहे त्यामुळे गावातील विज बिल भरले जात नाही या कारणाने दिनांक 29/7/2022शुक्रवार या दिवशी सकाळ पासुन वीज पुरवठा खंडित केला आहे तो गावातील वीज बिल पूर्णपणे वसूल केल्यावर ती वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. अशा तुलघी  कारभरामुळे कोठारीवासी हवालदील झाले आहे. 

मांडवी परिसरात मागील काही  दिवसापासून  अतिवृष्टी असून शेतामध्ये पूर्ण पाणी साचले असून शेतकरी वर्ग पूर्णपणे घरी बसलेला असून काही मजुरांना मजुरी लागत नसल्यामुळे अशा परिस्थिती वीज बिल भरणे शेतकरी व मोल मजुरी करणारे गावकरी यांनाअशक्य आहे. ग्रामपंचायतीत प्रशासकीय कारभार असल्याने बिल काडण्यास वेळ लागत आहे कारण ग्रामपंचायीकडे या पूर्वी  कोणतीही नोटिस किंवा  पत्र देण्यात आले नाही पुर्व सुचना न देताच विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला व गावकऱ्यांना वीज वापरताना मीटर बसविणे व नियमित बिल भरणे या साठी जनजागृती गावात केली गेली नाही व गावकऱ्यांना बिलभरा नाहीतर गावातील वीज पुरवठा खंडित केला जाईल असे ग्रामपंचायत  येथे सभा घेऊन गावकऱ्यांना सूचना देण्यात आली नाही. व असे अचानक गावाची वीज पुरवठा खंडित केला जात आहे.पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये  ओला दुष्काळ पडलेला असून शेतकऱ्याकडे सध्या आर्थिक परिस्थिती बेताची असून मांडवी परिसरातील महा वितरण कार्यालयाचे बेजबाबदार कारभाराचे शासनाने तात्काळ लक्ष देऊन कोठारी सिंध या गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी तेथील सर्व  गावकरी करीत  येत आहे विशेष बाब म्हणजे कोठारी येथे आरोग्य शिबीर सुरू आहे व शस्त्रक्रिया सुरू आहे गावात .

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला