नांदेड:-
आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्याचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे.
याचेच अनूकरण करत सॅटेलाईट डिजीटल पब्लिक स्कूल गणेश नगर रोड,नांदेड येथिल शाळेमध्ये कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधी नंतर नियमित प्रमाणे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थीनीं वारकरी वेशभूषा करून दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी घेतला. गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळाला गंध, डोक्यावर तुळस, हातात भगव्या पताका घेऊन विठ्ठलाच्या नामघोषाच्या गजरात पालखी सोहळा संपन्न केला. टाळ, मृदुंग वाद्यवृंदाने परिसर दुमदुमून गेला. याचबरोबर अभंग आणि भजन गात विद्यार्थ्यांनी रिंगण तसेच फुगडीचा आनंद लुटला.
शाळेचे मुख्याध्यापक नितीन सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे
या कार्यक्रमासाठी सौ.अर्चना गायकवाड,सौ.सुनंदा वाघमारे
आणि सौ.आम्रपाली वाघमारे यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती पत्रकारस देण्यात आले.
Comments
Post a Comment