Skip to main content

मराठवाड्यासह किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस


सौजन्य- सम्यक सर्पे

किनवट,दि.(प्रतिनीधी) :  तालुक्यात  रविवारी (दि.10) सकाळपर्यंतच्या 24 तासांत खर्‍या अर्थाने मान्सून सक्रिय झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालुक्यातील एकूण नऊ मंडळात दमदार पाऊस बरसला असून, शिवणी मंडळात सर्वात जास्त मुसळधार पाऊस कोसळल्याने तिथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यातील नऊ मंडळातील एकूण पाऊस 449.80 मि.मी.झाला असून, त्याची सरासरी 49.98 अर्थात 50 मिलिमीटर आहे.  पैनगंगा दुथडी भरून वहात असल्यामुळे, काठालगतच्या शेतात पाणी शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे कळते. पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून सर्व विभाग सतर्क झाले आहेत.


रविवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून,  कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 58.3 (327.4 मि.मी.); बोधडी- 58.3(403.3 मि.मी.); इस्लापूर- 50.0(490.0 मि.मी.); जलधरा- 48.0 (417.1 मि.मी.); शिवणी- 102.5 (475.9 मि.मी.); मांडवी- 24.8(252.6 मि.मी.);  दहेली- 24.8 (251.0 मि.मी.), सिंदगी मो. 58.3 (253.4 मि.मी.); उमरी बाजार 24.8 (280.4 मि.मी.).तालुक्यात जुलैच्या पहिल्या दिवसापासूनच दररोज हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यात काही भागात दमदार कोसळलेल्या पावसामुळे पहिली अतिवृष्टी जलधरा मंडळात, दुसरी इस्लापूर मंडळात तर आजच्या नोंदीनुसार तिसरी अतिवृष्टी शिवणी मंडळात झालेली आहे. तालुका सध्यातरी पाणीदार झाला असून, अतिवृष्टीमुळे कुठे जिवित हानी झाल्याची बातमी सध्यातरी नाही. मात्र, किनवट पासूनच जवळच असलेल्या कोठारी नाला पावसामुळे तीन दिवसापासून दुथडी भरून वहात असल्यामुळे वाहतूक तीन दिवसापासून बंद असून, त्या भागातील  शनिवारपेठ, मदनापूर,भुलजा,पार्डी बु, येंदा-पेंदा एकूण बारा गावाशी गेल्या तीन  दिवसापासून संपर्क तुटला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 3,151.1  मि.मी.असून, त्याची सरासरी 350.12 मि.मी.येते.  आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस इस्लापूर मंडळात झाला असून, सर्वात कमी दहेली मंडळात झालेला आहे. तालुक्यात रविवार 10जुलै पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस  285.4  मि.मी.असून, त्या तुलनेत 122.68 टक्के पाऊस पडलेला आहे. जो की,  समाधानकारक आहे.


     01जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यादरम्यान तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 951.90  मि.मी. असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 36.78 टक्के पाऊस पडलेला आहे. तसेच 01 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 1026.58 मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 34.10 टक्के पाऊस पडलेला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत पडलेला पाऊस  375.90 मि.मी.पडला होता.  30 सप्टेंबर पर्यंतच्या वार्षिक पावसाच्या तुलनेत  त्याची टक्केवारी 131.71 होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...