Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट देऊन वाढदिवस साजरा


 

पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांनी जपली माणुसकी....


पिंपरी चिंचवड : व्यस्त जीवनशैलीतून थोडासा  वेळ काढून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने तसेच वयोवृद्धांच्या सहवासात काही वेळ घालवून त्यांच्या समस्या जाणून  घेण्याच्या उद्देशाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, पिंपरी चिंचवडच्या महिला उपाध्यक्षा उषा लोखंडे या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील महिलांना जीवनावश्यक वस्तू व फळं भेट देवून साजरा करण्यात आला.

  सदर वाढदिवस बिजलीनगर (चिंचवड) येथील मातृसेवा संस्थेला  भेट देऊन साजरा करण्यात आला.

यावेळी तेथील वृद्ध स्त्रियांशी संवाद साधून त्यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने जिवनावश्यक भेटवस्तू, बिस्कीट व फळं देऊन साजरा करण्यात आला. 

 यावेळी आबाल वृद्धांशी संपर्क साधून त्यांच्याशी हितगुज करण्यात आले. काही महीलांनी लव यु म्हणत स्वागत केले तर काहींनी गाणे गाऊन पत्रकारांना चांगला प्रतिसाद दिला. काहींना स्मृतीभ्रंष झाल्याचे आढळले, यावेळी जिवनातील शेवटच्या टप्प्यांच्या कंगोर्याचे वास्तव दर्शनही येथे झाले. अशा वेळी अनेकांचे डोळे पाणावले.


मातृसेवा संस्थेच्या संचालिका संस्कृती यांनी यावेळी संस्थेबद्दल माहीती दिली. शिवाय संस्थेला आर्थिक मदतीची गरज असल्याने मदतीची मागणी केली. मुळ संस्थापक गोडसे व त्यांचे संपूर्ण कुटुंब संस्थेत सेवाभावी वृत्तीने सहभागी झाले आहेत याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजन नायर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संतोष रणसिंग, महिला शहराध्यक्षा मंदा बनसोडे, शहर उपाध्यक्षा उषा लोखंडे, सह सचिव निर्मला जोगदंड, सचिव संजीवनी कदम, कोषाध्यक्ष राजेश शिंदे, सदस्य शोभा क्षीरसागर, सदस्य हुसेन खान, सदस्य आली ईराणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...