लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सेना २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करत आहे.जम्मू काश्मीर मधील कारगिल जिल्ह्याच्या उंच पहाडी इलाख्यामध्ये हे युद्ध लढले गेले. पहाडी इलाख्यामध्ये पाकिस्तानी पाच हजार घुसखोरानी कारगिल जिल्ह्याचा काही भाग व्यापला होता त्यांची ही हरकत थांबत नसल्याने भारतीय सैनिकांनी ३ मे, १९९९ ला चढाई केली व युद्धाची ठिणगी पडली. हे युद्ध साठ दिवस चालले असून या युद्धात भारतचे ७५ जवान शहीद झाले. मात्र पाच हजार घुसखोरांना नेस्तनाबूत करून आपल्या विजयाची पताका २६ जुलै १९९९ ला सैनिकानी कारगिलच्या उंच पहाडीवर रोवली आणि ही पताका आजही मोठया डौलाने फडकत आहे. याचे स्मरण म्हणून भारतीय सेना कारगिल विजय दिन म्हणून साजरा करत असते. याचाच भाग म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने कारगिल विजय दिन रीमजिमत्या पावसात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, उपाध्यक्ष महादेव पोलदासे, संघटक संजय राजोळे, महिला अध्यक्षा वैशाली पाटील, श्रीकांत चलवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment