Skip to main content

किनवट येथील क्रिडा संकुलाची बिकट अवस्था , क्रिडा अधिकारी कायमस्वरूपी पाहीजे क्रिडा प्रेमींची मागणी


(किनवट शहर प्रतिनिधी):-

   शहरांमधील युवक व नागरिकांना मॉर्निंग वॉक, व्यायाम व बॅडमिंटन खेळण्याकरिता क्रीडा संकुलन असून या संकुलनची दयनीय अवस्था बनत चालली आहे . बॅडमिंटन इंनडोअर हॉलमधील दोन उडणकोट असून पूर्णपणे  निकामी झाले असल्याकारणाने आदिवासी दुर्गम भागातील युवक नागरिकांना खेळण्याकरीता उडनकोट किंवा पर्यायीकोट तयार करून देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन तालुकाक्रीडा संकुलन अधिकारी यांच्या मार्फत क्रीडा संकुलन सचिव तहसीलदार यांना न .पा. चे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अभय महाजन यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी दिले आहे .
        याबाबत सविस्तर वृत्त असे की, किनवट शहरात सहायक जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कार्यकाळात क्रीडा संकुलन उभारणी करण्यात आली होती . या क्रीडा संकुलांचा उपयोग अनेक नागरिक व व्यायाम करण्याकरीता युवक वर्ग घेत होते. बॅडमिंटन खेळण्याकरिता अनेक खेळाडू व कर्मचारी वर्ग इंन डोअर बॅडमिंटन कोट चा फायदा घेतात. परंतु आज या दोन्ही कोट ची दयनीय अवस्था झाली आहे. तर लाईटची सुविधा नाही. सर्व रिपर निघाल्यामुळे खेळताना त्यांचे पायस गंभीर दुखापत होण्याची भीती निर्माण झाली आहे. वारंवार या दोन्ही कोटची दुरुस्ती करण्याची मागणी करूनही यावर दुर्लक्ष केल्या जात आहे. येथे निकामी झालेल्या कोटवर बॅडमिंटनच्या अनेक स्पर्धा घेतल्या जातात. या क्रीडा संकुलन करिता क्रिडाधिकारी नियुक्ती असूनही त्यांची भेटत दुर्मिळ असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
       क्रिडा संकुलन समितीचे अध्यक्ष आमदार तर  सचिव तहसीलदार यांची नियुक्ती असल्याने बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूंनी तहसीलदार यांना सीएनटी किंवा कोबाकोट तयार करून मिळणे बाबतचे लेखी निवेदन तालुका क्रीडा संकुलन अधिकारी यांना दिले आहे. बॅडमिंटन इंडोअर कोटची तात्काळ दुरुस्ती व लाईट लावून द्यावे अशी मागणी खेळाडूंमधून जोर धरत आहे. या निवेदनावर अभय महाजन, शिवाजी जाधव, प्रशांत कोरडवार, अनिल राठोड, संजय नेम्मानीवार, राजेश ठोंबरे, प्रमोद पोहरकर, शादाब शेख, सिडाम सर, चंदनकर, एडके, भोसले, बंडू राठोड, चंद्रशेखर व्यवहारे, दत्ता गिराम या खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.