Skip to main content

पैनगंगा नदी काठावरील अतिवृष्टी बाधित गावांना तात्काळ मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश


किनवट ता.२३ :  हिंगोली लोकसभा मतदार संघातील पैनगंगा नदीपात्रांच्या काठावर वसलेल्या हदगाव , किनवट, उमरखेड व वसमत विधानसभा मतदार संघातील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे शेतीपिकांसह जनावरे दगवाली आहेत. सध्या या गावातील नागरीकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना प्रशासनाकडुन तातडीची मदत द्यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड, हिंगोली व यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांना आदेश  दिले असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली 

              खासदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.२३) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन हिंगोली लोकसभा मतदार संघातील पैनगंगा नदीच्या काठावरील नागरीकांना प्रशासनाकडुन वेळेवर मदत दिली जात नसल्याची माहिती दिली. त्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना भ्रमनध्वनी वरुन संपर्क साधत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याच्या सुचना दिल्या आहेत. काही दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघात संततधार पाऊस झाल्याने या पावसाचा शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. वसमत, किनवट, माहूर, हदगाव, उमरखेड विधानसभा क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी गोठ्यात बांधलेली जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. तेंव्हा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकपाहणी करुन पंचनामे करण्यात वेळ न घालवता नुकसानग्रस्त नदी काठावरील शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ आर्थिक मदत द्यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांना आदेश दिले.

             खासदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रपती निवडणूकीस दिल्लीला जाण्यापूर्वी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील  किनवट, हिमायतनगर तालुक्यासह अप्पाराव पेठ, इस्लापूर , वडगाव, सरसम, वसमत तालुक्यातील कुरुंदा मंडळातील अनेक भागाचा दौरा केला. व शेतीचे आणि नागरिकांच्या घरांची पडझड होऊन नुकसान झाल्याचा आढावा घेतला होता. मुसळधार झालेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.  शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचे पूर्ण पीक गेले आहे. पुरामुळे शेतीसुद्धा खरडून गेल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी दुबार आणि तिबार पेरणी केल्यानंतर नुकत्याच उगवलेल्या सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी जमीनच खरडून गेल्याने आता पेरायचे कुठे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला व घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नुकसानग्रस्त याभागातील शेती आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अर्थीक मदत देण्यात यावी. प्रशासनाकडुन देण्यात येणाऱ्या आर्थिक मदत कामात दिरंगाई करू नये अश्या सूचना खासदार हेमंत पाटील यांनी संबंधितांना दिल्या.


चौकट  - 


वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील गावात पुराचे पाणी शिरल्यानंतर देखील पुरबाधितांना प्रशासनाकडुन रात्री उशिरापर्यंत कुठलीही मदत दिली गेली नसल्याचे समजताच खासदार हेमंत पाटील यांनी रात्री ११ वाजता कुरुदा गावास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन प्रशासनास चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान गावातील पुराची भिषणता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर कुरुदा गावास शासनाकडुन पावनेदोन कोटी रुपयाची तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच  पुल व रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या सुचना खासदार हेमंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या आधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला