Skip to main content

पैनगंगा नदी काठावरील अतिवृष्टी बाधित गावांना तात्काळ मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश


किनवट ता.२३ :  हिंगोली लोकसभा मतदार संघातील पैनगंगा नदीपात्रांच्या काठावर वसलेल्या हदगाव , किनवट, उमरखेड व वसमत विधानसभा मतदार संघातील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे शेतीपिकांसह जनावरे दगवाली आहेत. सध्या या गावातील नागरीकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना प्रशासनाकडुन तातडीची मदत द्यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड, हिंगोली व यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांना आदेश  दिले असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली 

              खासदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.२३) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन हिंगोली लोकसभा मतदार संघातील पैनगंगा नदीच्या काठावरील नागरीकांना प्रशासनाकडुन वेळेवर मदत दिली जात नसल्याची माहिती दिली. त्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना भ्रमनध्वनी वरुन संपर्क साधत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याच्या सुचना दिल्या आहेत. काही दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघात संततधार पाऊस झाल्याने या पावसाचा शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. वसमत, किनवट, माहूर, हदगाव, उमरखेड विधानसभा क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी गोठ्यात बांधलेली जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. तेंव्हा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकपाहणी करुन पंचनामे करण्यात वेळ न घालवता नुकसानग्रस्त नदी काठावरील शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ आर्थिक मदत द्यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांना आदेश दिले.

             खासदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रपती निवडणूकीस दिल्लीला जाण्यापूर्वी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील  किनवट, हिमायतनगर तालुक्यासह अप्पाराव पेठ, इस्लापूर , वडगाव, सरसम, वसमत तालुक्यातील कुरुंदा मंडळातील अनेक भागाचा दौरा केला. व शेतीचे आणि नागरिकांच्या घरांची पडझड होऊन नुकसान झाल्याचा आढावा घेतला होता. मुसळधार झालेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.  शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचे पूर्ण पीक गेले आहे. पुरामुळे शेतीसुद्धा खरडून गेल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी दुबार आणि तिबार पेरणी केल्यानंतर नुकत्याच उगवलेल्या सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी जमीनच खरडून गेल्याने आता पेरायचे कुठे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला व घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नुकसानग्रस्त याभागातील शेती आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अर्थीक मदत देण्यात यावी. प्रशासनाकडुन देण्यात येणाऱ्या आर्थिक मदत कामात दिरंगाई करू नये अश्या सूचना खासदार हेमंत पाटील यांनी संबंधितांना दिल्या.


चौकट  - 


वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील गावात पुराचे पाणी शिरल्यानंतर देखील पुरबाधितांना प्रशासनाकडुन रात्री उशिरापर्यंत कुठलीही मदत दिली गेली नसल्याचे समजताच खासदार हेमंत पाटील यांनी रात्री ११ वाजता कुरुदा गावास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन प्रशासनास चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान गावातील पुराची भिषणता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर कुरुदा गावास शासनाकडुन पावनेदोन कोटी रुपयाची तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच  पुल व रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या सुचना खासदार हेमंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या आधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.