Skip to main content

राष्ट्रपतीपदी द्रोपदी मुर्मू यांची निवड झाल्या मुळे व स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षण बहाली बद्दल भाजप तर्फे जल्लोष




 किनवट ता. प्र दि २१ सुप्रिम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षण बहाल केले व राष्ट्रपती पदी पहिल्या आदिवासी महिला विजयी झाल्याचा उत्सव किनवट भाजपा तर्फे शहरात भव्य रॅली, आतिषबाजी, ढोलताशासह लाडु वाटप करुन साजरा करण्यात आला. किनवट भाजपा तर्फे आमदार भिमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही आनंदी घटनां आनंदाने साज-या करण्यात आल्या. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथिल प्रतिमेला अभिवादन करत मुख्य रस्त्यावरुन रॅली काढण्यात आली होती. तर जिजामाता चौक व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात लाडु वाटप करण्यात आले.

यावेळी बोलतांना भाजपाचे तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी देशाच्या राष्ट्रपती पदी आदिवासी महिलेला विराजमान केल्या बद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेतृवाचे आभार व्यक्त केले, तर राज्यातील नविन स्थापन झालेल्या युती शासनाच्या प्रयत्नातुन ओबीसी समाजाला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण बहाल केल्या बद्दल हि शासनाचे आभार व्यक्त केले. 

शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले कि भाजपा ने आपले घोषवाक्य सबका साथ सबका विकास हे पुन्हा एकदा सिध्द केले असुन यापुर्वी मुस्लिम समाजाचे शास्त्रज्ञ ए.पी.जे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती पदी बसवले त्या नंतर दलित समाजाचे रामनाथ कोविंद यांना संधी दिली तर यावेळी आदिवासी समाजाच्या महिला दौपदी मुर्मु यांना संधी दिल्याने भाजपा बोले तैसा चाले असेच राजकारण करते यामुळे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे, ज्येष्ठ नेते सुधाकर भोयर ,माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार, किसान मोर्चाचे सुधाकर,  ज्येष्ठ नेते अनिल तिरमनवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, युवा मोर्चाचे उमाकांत क-हाळे, माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार, नगरसेवक शिवा आंधळे,  सभापती दत्ता आडे, कपिल करेवाड, बाळकृष्ण कदम, संजय रेड्डी, शिवा क्यातमवार, नरेश सिरमनवार, विश्वास कोल्हारीकर, ओबीसी आघाडीचे शेखर चिंचोळकर, जय वर्मा, सतिष बिराजदार, परमेश्वर मुराडवार, बालाजी धोत्रे, जितेंद्र कुलसंगे, अशोक नैताम, सुनिल मच्छेवार, अंकुश साबळे, राहुल दारगुलवार, सुनिल चव्हाण, बालाजी चव्हाण, सुरेश साकपेल्लीवार, यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.