Skip to main content

राष्ट्रपतीपदी द्रोपदी मुर्मू यांची निवड झाल्या मुळे व स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षण बहाली बद्दल भाजप तर्फे जल्लोष




 किनवट ता. प्र दि २१ सुप्रिम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षण बहाल केले व राष्ट्रपती पदी पहिल्या आदिवासी महिला विजयी झाल्याचा उत्सव किनवट भाजपा तर्फे शहरात भव्य रॅली, आतिषबाजी, ढोलताशासह लाडु वाटप करुन साजरा करण्यात आला. किनवट भाजपा तर्फे आमदार भिमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही आनंदी घटनां आनंदाने साज-या करण्यात आल्या. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथिल प्रतिमेला अभिवादन करत मुख्य रस्त्यावरुन रॅली काढण्यात आली होती. तर जिजामाता चौक व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात लाडु वाटप करण्यात आले.

यावेळी बोलतांना भाजपाचे तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी देशाच्या राष्ट्रपती पदी आदिवासी महिलेला विराजमान केल्या बद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेतृवाचे आभार व्यक्त केले, तर राज्यातील नविन स्थापन झालेल्या युती शासनाच्या प्रयत्नातुन ओबीसी समाजाला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण बहाल केल्या बद्दल हि शासनाचे आभार व्यक्त केले. 

शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले कि भाजपा ने आपले घोषवाक्य सबका साथ सबका विकास हे पुन्हा एकदा सिध्द केले असुन यापुर्वी मुस्लिम समाजाचे शास्त्रज्ञ ए.पी.जे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती पदी बसवले त्या नंतर दलित समाजाचे रामनाथ कोविंद यांना संधी दिली तर यावेळी आदिवासी समाजाच्या महिला दौपदी मुर्मु यांना संधी दिल्याने भाजपा बोले तैसा चाले असेच राजकारण करते यामुळे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे, ज्येष्ठ नेते सुधाकर भोयर ,माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार, किसान मोर्चाचे सुधाकर,  ज्येष्ठ नेते अनिल तिरमनवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, युवा मोर्चाचे उमाकांत क-हाळे, माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार, नगरसेवक शिवा आंधळे,  सभापती दत्ता आडे, कपिल करेवाड, बाळकृष्ण कदम, संजय रेड्डी, शिवा क्यातमवार, नरेश सिरमनवार, विश्वास कोल्हारीकर, ओबीसी आघाडीचे शेखर चिंचोळकर, जय वर्मा, सतिष बिराजदार, परमेश्वर मुराडवार, बालाजी धोत्रे, जितेंद्र कुलसंगे, अशोक नैताम, सुनिल मच्छेवार, अंकुश साबळे, राहुल दारगुलवार, सुनिल चव्हाण, बालाजी चव्हाण, सुरेश साकपेल्लीवार, यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...