Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

 



करमाळा तालुका शाखेच्या वतीने आयोजन


करमाळा, सोलापूर : 

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य या संघाच्या करमाळा तालुका शाखेच्या वतीने १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा शनिवार दि.२३ जुलै, २०२२ रोजी पंचायत समिती सभागृह, करमाळा, जिल्हा सोलापूर येथे दुपारी १२.३५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 सदर सन्मान सोहळा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेने, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

हा सन्मान सोहळा करमाळाचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून करमाळा तालुक्याचे तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही. एन. माने, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश (भाऊ ) करे -पाटील, ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबुराव हिरडे उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापुरकर, दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य संपादक पंडीत हणमंते, संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे, लातूर जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, ग्लोबल सायन्स इंस्टिट्युट, करमाळाचे संस्थापक महेश निकत, संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष पंकज धायगुडे-पाटील, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कल्याण देहाडे, लोकस्वराज्य प्रतिष्ठान करमाळाच्या अध्यक्षा ॲड.सविताताई शिंदे,

 दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार तथा माढा तालुका शिक्षण सल्लागार समितीचे सदस्य धनंजय मोरे, पदमाळे क्लासेस करमाळाच्या संचालिका ॲड. अपर्णाताई पदमाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 

हा सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई  चांदणे, जिल्हा उपाध्यक्षा विजया कर्णवर, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, तालुका अध्यक्ष बाळासाहेब भिसे, जेऊर शहर अध्यक्ष आबासाहेब झिंजाडे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब शिंदे, तालुका सचिव अक्षय वरकड, तालुका संपर्क प्रमुख प्रमोद खराडे, संघाच्या सदस्या माधुरीताई कुंभार, सदस्य अंगद भांडवलकर, धनंजय पाटील ,संजय चांदणे, श्रीमंत दिवटे आदी पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.

या गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व नागरिक, पालक व विद्यार्थ्यानी उपस्थित रहावे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, करमाळा तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे .

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला