✍🏿राजेश पाटील/ किनवट ता. प्रतिनिधी:-
किनवट तालुक्यासह अनेक ग्रामिण भागात पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस पडत असल्याने पुर परीस्थीती निर्माण झाली आहे विदर्भ- मराठवाड्याला जोडणारा पैनगंगा नदीवरुन पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पुराचे पाणी साई मंदीर, गजानन मंदीर, व गंगानगर वस्तीत घुसले व तेथील कृष्णप्रिय गोशाळेतील गायींना स्वंयसेवकांनी पुरातुन बाहेर काढत आहे.
अनेक लोक घरातील पसारा घेऊन जात काही जण कॉस्मापॉलिटन विद्यालय व बाबासाहेब मुखरे विद्यालय येथे आसरा घेतला आहे तर पुलावरून पाणी जातानां वाहन चालवीणे घातक असल्यांने पोलीस प्रशासनांने चोख बंदोबस्त ठेवला आहे.
घोटी पुल, बसस्थानक जवळील पुल, कोठारी पुल, हिमायतनगर , गांजेगाव, यासह अनेक गावांना पाण्याने वेढले आहे.
नदी काठच्या घरांना उपविभागिय कार्यालय ,तहसिल प्रशासन, न.प. प्रशासन यांनी सतर्कतेचा आदेश दिला आहे .
पुर परीस्थीती पाहण्यासाठी किनवट- माहुरचे आमदार भिमराव केराम यांनी परीस्थीतीचा आढावा घेतला आहे.
Comments
Post a Comment