''टाळी वाजवून, ताल धरावा अन चालावी वाट ती पंढरीची''. आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन .... विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभुषा करून लोकांचे लक्ष वेधले
पिंपरखेड/ नांदेड प्रतिनिधी:-
आषाढी एकादशीचा मोहोत्सव
''टाळी वाजवून, ताल धरावा
अन्
चालावी वाट ती पंढरीची''
पंढरीची वारी, मग ती आषाढीची असो वा कार्तिकीची, या दोन वाऱ्या म्हणजे वारकऱ्यांचा मोक्षमार्ग.
पावसाळा सुरु झाला की आषाढातील पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्याचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे.
याचेच अनूकरण करत भारती इंग्लिश स्कूल, पिंपरखेड या.हदगाव जि.नांदेड येथिल शाळेमध्ये कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधी नंतर नियमित प्रमाणे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले.इयत्ता नर्सरी ते पाचवीच्या वर्गातील चिमुकल्या विद्यार्थीनीं वारकरी वेशभूषा करून दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी घेतला. गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळाला गंध, डोक्यावर तुळस, हातात भगव्या पताका घेऊन विठ्ठलाच्या नामघोषाच्या गजरात पालखी सोहळा संपन्न केला. टाळ, मृदुंग वाद्यवृंदाने परिसर दुमदुमून गेला. याचबरोबर अभंग आणि भजन गात विद्यार्थ्यांनी रिंगण तसेच फुगडीचा आनंद लुटला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रूचिरा बेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे
या कार्यक्रमासाठी सौ.कलपना चव्हाण,सौ.रिना आमदरे
कु.शितल वाघमारे, नंदकुमार हदरगे, सौरभ चव्हाण आणि जनाबाई पचलिंगे यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती पत्रकारस देण्यात आले.
Comments
Post a Comment