Skip to main content

कुरुंदा गाव कायमस्वरूपी पुरमुक्त करणार खासदार हेमंत पाटील ; पुरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य किटचे वितरण



हिंगोली /नांदेड : थोडासा पाऊस झाला की कुरुंदा गावात नेहमी पुराचे पाणी शिरते त्यामुळे नागरीकांचे हाल होतात.  कुरुंदा येथील पूर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गावाला संरक्षण भिंत उभारण्यात येईल व पुढील चार ते पाच महिन्यांत हि संरक्षण भिंत उभारून कुरुंदा गाव कायमस्वरूपी पुरमुक्त करण्यात येणार आहे. असा विश्वास हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. 


    मागील तीन  दिवसापासून होणाऱ्या संततधार पावसामुळे  हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा व किन्होळा या दोन गावात पुराचे पाणी शिरल्याने गावासह शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पुरग्रस्त कुटुंबीयांना खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी ता. १० रोजी भेट दिली व त्याना अन्नधान्य किटचे वितरण पूर परिस्थितीची पाहणी केली . तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व गावातील पुरपरस्थितीने गावाचे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.त्यानंतर जिल्हा प्रशासनाला सूचना देत  व पुरग्रस्त कुटुंबीयांना कुठल्याही अत्यावश्यक वस्तू व संसार उपयोगी साहित्य कमी पडू देऊ नयेत  सुचना दिल्या. सोबतच ज्या शेतकऱ्याचे जनावरे पुरात वाहून गेले त्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपये मोबदला देण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच कुरुंदा गावातील पूरग्रस्त व गावकऱ्यांना  सर्वोतोपरी मदत केली जाईल कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही असेही ते म्हणाले .  दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी कुरुंदा गावालगत असलेल्या नदीची जिल्हाधिकारी यांच्यासह पहाणी केली व गावाला कायमचे पुरमुक्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना देखील सुचना करून ताबडतोब अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. व पुढील चार महिन्यात संरक्षण भिंत उभारून गावाला कायमस्वरूपी पूर मुक्त करण्याचा निर्धार केला आहे . यावेळी  तालुका प्रमुख   राजु चापके, संभाजी सिद्धेवार, जितेंद्र महाजन, दत्ताराम इंगोले, सरपंच राजेश पाटील इंगोले, भय्या दळवी, व्यंकटेश कऱ्हाळे  आमदार राजु नवघरे, माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, तहसिलदार अरविंद बोळंगे, उप विभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ,यांच्यासह गावकरी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला