Skip to main content

कुरुंदा गाव कायमस्वरूपी पुरमुक्त करणार खासदार हेमंत पाटील ; पुरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य किटचे वितरण



हिंगोली /नांदेड : थोडासा पाऊस झाला की कुरुंदा गावात नेहमी पुराचे पाणी शिरते त्यामुळे नागरीकांचे हाल होतात.  कुरुंदा येथील पूर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गावाला संरक्षण भिंत उभारण्यात येईल व पुढील चार ते पाच महिन्यांत हि संरक्षण भिंत उभारून कुरुंदा गाव कायमस्वरूपी पुरमुक्त करण्यात येणार आहे. असा विश्वास हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. 


    मागील तीन  दिवसापासून होणाऱ्या संततधार पावसामुळे  हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा व किन्होळा या दोन गावात पुराचे पाणी शिरल्याने गावासह शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पुरग्रस्त कुटुंबीयांना खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी ता. १० रोजी भेट दिली व त्याना अन्नधान्य किटचे वितरण पूर परिस्थितीची पाहणी केली . तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व गावातील पुरपरस्थितीने गावाचे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.त्यानंतर जिल्हा प्रशासनाला सूचना देत  व पुरग्रस्त कुटुंबीयांना कुठल्याही अत्यावश्यक वस्तू व संसार उपयोगी साहित्य कमी पडू देऊ नयेत  सुचना दिल्या. सोबतच ज्या शेतकऱ्याचे जनावरे पुरात वाहून गेले त्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपये मोबदला देण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच कुरुंदा गावातील पूरग्रस्त व गावकऱ्यांना  सर्वोतोपरी मदत केली जाईल कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही असेही ते म्हणाले .  दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी कुरुंदा गावालगत असलेल्या नदीची जिल्हाधिकारी यांच्यासह पहाणी केली व गावाला कायमचे पुरमुक्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना देखील सुचना करून ताबडतोब अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. व पुढील चार महिन्यात संरक्षण भिंत उभारून गावाला कायमस्वरूपी पूर मुक्त करण्याचा निर्धार केला आहे . यावेळी  तालुका प्रमुख   राजु चापके, संभाजी सिद्धेवार, जितेंद्र महाजन, दत्ताराम इंगोले, सरपंच राजेश पाटील इंगोले, भय्या दळवी, व्यंकटेश कऱ्हाळे  आमदार राजु नवघरे, माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, तहसिलदार अरविंद बोळंगे, उप विभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ,यांच्यासह गावकरी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.