Skip to main content

जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची 28 जुलै रोजी आरक्षण सोडत




नांदेड  दि. 27 :- राज्‍य निवडणूक आयोगाकडील आरक्षण सोडत सुधारीत कार्यक्रमानुसार नांदेड जिल्‍हा परिषद सदस्‍य पदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही सोडत गुरुवार 28 जुलै 2022 रोजी डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भव‍नाच्या प्रेक्षागृहात  जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्‍यक्षतेखाली  सकाळी 11 वा. काढण्‍यात येणार आहे.

जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्‍य पदांसाठीच्‍या आरक्षणाची सोडत तालुकापातळीवर काढण्यात येत आहे.  गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. किनवट, हदगाव, नांदेड, भोकर, धर्माबाद, बिलोली, कंधार व देगलूर तालुका मुख्‍यालयी तर माहूर, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, उमरी, नायगाव (खै), लोहा व मुखेड या तालुक्यांसाठी 28 जुलै रोजीच दुपारी 4 वाजता संबधित तहसिलदार यांच्याकडून संबधीत उपविभागीय अधिकारी यांच्‍या नियंत्रणात पंचायत समिती सदस्‍य पदांसाठीच्‍या आरक्षणाची सोडत काढण्‍यात येणार आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या नागरिकांना या सभेस उपस्थित राहण्याची इच्छा आहे त्यांनी नमूद ठिकाणी व वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.



हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी  :

नांदेड जिल्‍हा परिषद व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्‍याचा दिनांक 29 जुलै 2022 आहे. तर आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्‍हा परिषद आरक्षण / संबंधित तहसिलदार यांच्याकडे पंचायत समिती आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी  29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम 12 उपकलम (1), कलम 58 (1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिलाकरीता राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.  


सोडतीचे ठिकाण व वेळ:

जिल्‍हा परिषद / पंचायत समितीचे नाव सभेची वेळ व तारीख, सभेचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. नांदेड जिल्‍हा परिषदेसाठी गुरुवार 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भव‍न जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे. माहूर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. पंचायत समिती सभागृह माहूर येथे. किनवट पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह किनवट येथे. हिमायतनगर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. पंचायत समिती सभागृह हिमायतनगर येथे. हदगाव पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह हदगाव येथे. अर्धापूर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. तहसिल कार्यालय सभागृह अर्धापूर येथे. नांदेड पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. उपविभागीय अधिकारी कार्यालय बैठक हॉल नांदेड येथे. मुदखेड पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. तहसिल कार्यालय मुदखेड येथे. भोकर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह भोकर येथे. उमरी पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. पंचायत समिती सभागृह उमरी येथे. धर्माबाद पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. नगरपरिषद सभागृह धर्माबाद येथे. बिलोली पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह बिलोली येथे. नायगाव खै. पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. कै. बळवंतराव चव्हाण पंचायत समिती सभागृह नायगाव खै. येथे. लोहा पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. सभागृह तहसिल कार्यालय लोहा येथे. कंधार पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह कंधार येथे. मुखेड पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. बैठक हॉल तहसिल कार्यालय मुखेड येथे. देगलूर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. शंकरराव चव्हाण सभागृह पंचायत समिती देगलूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला