Skip to main content

खासदार हेमंत पाटील यांनी पीक नुकसानीची पाहणी करून तात्काळ आर्थिक मदत देण्याचे दिले निर्देश



हिंगोली/वसमत/नांदेड:

नुकत्याच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनच्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात केळी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याअनुषंगाने वसमत तालुक्यातील   गिरगाव, खाजमापूर येथील नुकसानग्रस्त शेतीची खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली व  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत  देण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशित केले.                 

      यावेळी खासदार हेमंत पाटील म्हणाले की , अवकाळी पावसामुळे, मागील सहा दिवसांपासून वीजपुरवठा नसल्याने पिण्याच्या पाण्याचा व विजेचा गंभीर प्रश्ननिर्माण झाला आहे. संबंधित अधिकारी यांनी विजेच्या तुटलेल्या तारा व विजेच्याखांबांची झालेली नासधूस तात्काळ दुरुस्त करण्यास सुरुवात करावी व शेतकऱ्यांनादिलासा द्यावा. विजेचा प्रश्न निर्माण झाल्याने अधिकारी फोन उचलत नसल्याच्या अनेकतक्रारी आल्या असून अधिकाऱ्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीलाप्राधान्य देऊन काम करावे असेही ते म्हणाले.वादळी वाऱ्यामुळे खाजमापूर वाडी येथीलघरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत त्या सर्व कुटुंबीयांचीभेट घेऊन  तातडीने मदत करण्याच्या सुचनातहसीलदारांना   दिल्या. तसेच अनेकशेतकऱ्यांचे  शेतातील सौरऊर्जा सोलारपॅनलचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना देखील शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी अशा सूचना खासदार हेमंत पाटील यांनी संबंधितांना दिल्या.हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, यासंदर्भात शेतकऱ्यांना पुरेपुर मदत मिळवून देण्यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्रीउद्धवजी ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे  खासदार हेमंत पाटील म्हणाले . तालुक्याचेतहसीलदार, महावितरण विभागाचे अधिकारी,  कृषी अधिकारी,पिक विमा अधिकारी व एजंट यांनारविवारी सुट्टीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर बोलावून शेतकऱ्यांच्या शेतीपिकांची विशेषतः भुईसपाट झालेल्या केळी पिकांचे पंचनामे करून तात्काळ मोबदलामिळवून देण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी निर्देशित करून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी  क्लेम केल्यास  त्यांना पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मदत मिळवून द्यावी असेही ते म्हणाले.    यावेळीशिवसेना वसमत तालुका प्रमुख राजू चापके,औंढा तालुका प्रमुख अंकुश आहेर, गिरगांवसरपंच देविदास पाटील कऱ्हाळे, कुरुंदा सरपंच राजेश पाटील इंगोले, माजीजिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे,माजी सरपंच कुरुंदा दत्तारामजीइंगोले,पंढरीनाथ क्षीरसागर ,लक्ष्मीकांत देशमुख , रेडगावसरपंच धनंजय पवार, युवासेना सरचिटणीस व्यंकटेश कऱ्हाळे, संभाजीसिद्धेवार, प्रमोद भुसारे,शिवराज यशवंते,रोडगासरपंच भद्रीनाथ कदम, बाबा अफूने,वसमत तहसीलदार अरविंद बोलंगे , तालुकाकृषि अधिकारी कल्याणपाड, उपाभियंता परचाके व असंख्य गावकरी,शेतकरी उपस्थित होतेयांच्यासह  शिवसेना  कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...