Skip to main content

विशाल हलवले यांचा जनसंपर्क चांगला असल्याने मोहपुर गटात त्यांच्याच नावाची चर्चा सुरु असुन लोंकाच्या आग्रहास्तव मोहपुर येथुन निवडणुक ताकतीने लढणार



 किनवट प्रतिनिधी:-

 नव्याने निर्माण झालेल्या मोहपूर जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून गतवेळी शिवसेनेकडून मांडवी गणातून निर्णायक मतदान घेणारे अंबाडी येथील तरुण युवा कार्यकर्ते विशाल हलवले यांनी आता जिल्हा परिषदेसाठी दंड  थोपटले असून  मोहपूर गटाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकआग्रहास्तव मी ही निवडणूक मोठ्या ताकतीने लढणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले


  नांदेड जिल्हा परिषदेची गट व गणनिहाय प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून किनवट तालुक्यात मोहपूर या नवीन गटाची निर्मिती करण्यात आली आहे या  गटात अंबाडी गावाचा समावेश करण्यात आल्यामुळे आतापासूनच राजकीय हालचाली वाढल्या असून प्रमुख पक्षांसह जुने व नवीन चेहरे निवडणुकीचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत यात प्रामुख्याने गतवेळी शिवसेनेकडूनकडून मांडवी गणातून निवडणूक लढवलेले तरुण युवा कार्यकर्ते विशाल हलवले  यांच्या नावाची आता जिल्हा परिषदेसाठी चर्चा  सुरू झाली असून त्यांच्यासाठी आंबाडी व परिसरातील असंख्य कार्यकर्ते आतापासूनच गावभेटी घेऊन वातावरण निर्मिती करण्यावर भर देत आहेत गेल्यावेळी  हलवले यांनी अठराशे च्या आसपास मतदान घेऊन मांडवी गटात खळबळ उडवून दिली होती या भागातील आदिवासी, बंजारा, दलित व मुस्लिम समाजात त्यांचा दांडगा संपर्क असून गोरगरीब, शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नासाठी ते रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात युवा नेते विशाल हलवले यांनी आता नव्याने अस्तित्वात आलेल्या मोहपूर गटासाठी निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे समर्थक आग्रही असून त्यांच्या उमेदवारीला जनतेचा मोठा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे  नव्या गटातील  एक निष्पक्ष निष्कलंक नवाचेहरा म्हणून  विशाल हलवले यांच्याकडे पाहिले जात आहे त्यांच्या पाठीमागे असलेली युवा कार्यकर्त्यांची फळी व या भागातील मतदारांचा पाठिंबा लक्षात घेता हलवले यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे दरम्यान या संदर्भात त्यांनी पत्रकारांशी बातचीत करताना सांगितले की मी गेल्या दहा वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करत आलो मोहपूर भागाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकाग्रहास्तव मी  निवडणूक लढण्यास इच्छुक आहे सध्या मी कोणत्याही पक्षात नसलो तरी लोकांसाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून या भागातील मतदारांचा मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे ही निवडणूक एखादया पक्षाकडून   लढवायची की अपक्ष लढवायची याचा निर्णय आरक्षण जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते व मतदारांना विचारपूस करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले

 निवडणुकीला अजून बराच अवधी शिल्लक आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच इच्छुकांच्या दाव्याला महत्त्व येणार असले तरी   एखाद्या प्रमुख पक्षाकडून  हलवले यांना उमेदवारी मिळाल्यास या गटात चुरसीची लढत पहावयास मिळणार आहे हे मात्र नक्की!

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला