Skip to main content

मोलमजुरी करणाऱ्या डुंबरेची लेक ९९.४० गुण मिळवुन जुन्नर तालुक्यात प्रथम

 


जुन्नर:-

कु.श्रावणी रामदास डुंबरे ओतूर ही  इयत्ता १० वीत  ९९.४०% गुण मिळावून जुन्नर तालुक्यात प्रथम आली आहे.तीची आई मोलमजुरी करते तर.... वडील चाकण येथे सेक्युरीटी गार्ड म्हणून नोकरी  करतात. जिद्द, सातत्य, परिश्रम , ठरवलेले ध्येय यांच्या जोरावर श्रावणीने मिळविलेले यश नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. एकीकडे इंग्लिश मिडीयमसाठीचा आग्रह , खाजगी ट्युशन, स्वतंत्र अभ्यास खोली हवे ते लाड पुरविण्याचा पालकांचा  प्रयत्न या बाबी एकीकडे आणि दुसरीकडे कुडाचे घर, सारवलेली जमीन , घरकामासाठी करावी लागणारी मदत , कुठलाही खाजगी क्लास नाही , कुठल्याही सुविधा नाहीत. तरीही एवढे गुण मिळविणे ही साधी बाब नव्हे. यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते की , बुध्दीमत्ता ही कुणाची मिरासदारी नाही. खरं तर सरस्वतीला गरीबांच्या झोपडीत राहायला आवडते.आणि सरस्वती आली की  पाठोपाठ आपोआप लक्ष्मी येतेच.यानिमित्ताने पालकांनी दुसरीही गोष्ट लक्षात घ्यावी. आपला पाल्य महत्त्वाच्या वर्गात आहे म्हणून , तो म्हणेल ते सर्वच लाड पुरवत बसू नये. कधीतरी नाही म्हणायची सवय सुध्दा ठेवावी. नाही तर कधी मनासारखे घडले नाही की मुले कुडतात ,कोलमडतात किंवा आक्रमक होतात. आपल्या पाल्यांस पुरवल्या जाणाऱ्या सोयींबरोबरच  , त्याला विश्वासात घ्यावे, ध्येय निश्चित करावे , वेळ उपलब्ध करून द्यावा, तो सतत उत्साही , आनंदी राहील असे पाहावे. त्याला प्रोत्साहन द्यावे.शारिरिक दृष्ट्या तो सक्षम राहील असे पाहावे. त्याच्या सोबत सकारात्मक गप्पा माराव्यात.अवास्तव दडपण टाकू नये किंवा अतिरिक्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.मला वाटत श्रावणीच्या बाबतीत या सर्व बाबी एकवटून घडल्या असतील. तीची मेहनत, पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तीला सर्वांनी दिलेल्या मनापासूनच्या शुभेच्छा. या जोरावर ती मोठ्या यशापर्यंत पोहचली. श्रावणी बेटी ! अशीच यशाची उंच शिखरे गाठत राहा.यशवंत हो! गुणवंत हो ! कीर्तीवंत हो !                               तुझ्या जिद्दीला, तुझ्या यशाला, आमचा सलाम..,...      जी.के.औटी सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...