Skip to main content

संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन व वृक्षारोपण

 


लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या हस्ते लातूर (पाखरसांगवी) येथील श्री रवींद्रनाथ टागोर शाळेच्या वाढीव वर्गाच्या खोलीचे भूमिपूजन, नियोजित जागेत लिंब, चिंच, आंबा, गवती चहा, इलायची आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संपर्क प्रमुख रियाज शेख, शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा पाटील, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले आई-बाबा, गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचे नाव रोशन करावे यासाठी संस्था सचिव वैशालीताई पाटील सातत्याने प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मोफत ड्रेस,मोफत भोजन, मोफत प्रवास अशा विविध प्रकारच्या सवलती देत संस्थेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून श्री रवींद्रनाथ टागोर विद्यालय, पाखरसांगवी ही शाळा यशस्वीतेकडे वाटचाल करीत असून या शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले असल्याने या शाळेशी आमचे कायम ऋणानुबंध आहेत अशी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी आपली भावना व्यक्त केली.जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झपाटलेल्या श्री रवींद्रनाथ टागोर विद्यालयासाठी आमची संघटना कायम सोबत असल्याचे प्रतिपादन केले. तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे व जिल्हा संपर्क प्रमुख रियाज शेख यांनी शाळेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापिका मेघा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...