Skip to main content

संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन व वृक्षारोपण

 


लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या हस्ते लातूर (पाखरसांगवी) येथील श्री रवींद्रनाथ टागोर शाळेच्या वाढीव वर्गाच्या खोलीचे भूमिपूजन, नियोजित जागेत लिंब, चिंच, आंबा, गवती चहा, इलायची आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संपर्क प्रमुख रियाज शेख, शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा पाटील, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले आई-बाबा, गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचे नाव रोशन करावे यासाठी संस्था सचिव वैशालीताई पाटील सातत्याने प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मोफत ड्रेस,मोफत भोजन, मोफत प्रवास अशा विविध प्रकारच्या सवलती देत संस्थेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून श्री रवींद्रनाथ टागोर विद्यालय, पाखरसांगवी ही शाळा यशस्वीतेकडे वाटचाल करीत असून या शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले असल्याने या शाळेशी आमचे कायम ऋणानुबंध आहेत अशी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी आपली भावना व्यक्त केली.जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झपाटलेल्या श्री रवींद्रनाथ टागोर विद्यालयासाठी आमची संघटना कायम सोबत असल्याचे प्रतिपादन केले. तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे व जिल्हा संपर्क प्रमुख रियाज शेख यांनी शाळेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापिका मेघा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला