Skip to main content

वरीष्ठ अधिका-यांच्या आदेशाला कंटाळून महावितरणचे कर्मचारी जाणासामुहिक रजेवर

 


किनवट : कार्यकारी अभियंता यांच्या विज बिल वसुलीसाठी चालू असलेल्या  प्रचंड दबावामुळे  व मे महीन्यात प्रचंड तापमान असतांनाही महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानूसार घेण्यात येणाऱ्या काळजी ऐवजी कार्यकारी अभियंता यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना दबाव तंत्राचा वापर करून सकाळी साडेसात ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत वसुली करण्याचे तोंडी आदेश दिल्यामुळे तालुक्यातील विज कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झााले आहेे.यामुळे महावितरणचे तांत्रिक कर्मचारी हे लवकरच पंधरा दिवसाच्या सामुहिक रजेवर जाणार आहेत.

   विज कर्मचाऱ्यांकडे केवळ विज बिल वसुलीचे काम नसून विज वाहीणी देखभाल दुरुस्ती चे काम देखील २४ तास पहाण्याची जबाबदारी आहे. ऐन उन्हाळ्यातील तापमानाच्या उखाड्यामुळे व वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे विज वाहीण्यावर व रोहीत्रांवर प्रचंड लोड वाढल्यामुळे वारंवार विज पुरवठा खंडीत होणे,वायर तुटने या घटना वाढल्यामुळे विज ग्राहकांना अखंडित विजपुरवठ्या ची सेवा देण्यासाठी अगोदरच अपुऱ्या असणाऱ्या विज कर्मचाऱ्यांना प्रचंड प्रमाणात धावपळ करावी लागत आहे.

त्यातच कार्यकारी अभियंता यांचे तुगलकी आदेश सकाळी साडेसात पासून रात्री साडेआठ पर्यंत केवळ विजबिल वसुली करण्याचे आदश व सदर वसुलीचे काम दिलेल्या उदिष्टापर्यंत न झाल्यास शिस्तभंगाची,पगार कपातीची निलंबनाची व बदलीची कार्यवाही अशा गंभीर स्वरुपाच्या कार्यवाह्या करण्याची वारंवार ताकीद दिल्या जात आहे.

   यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा तान व तनावामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. 

त्यामुळे कर्मचाऱ्यांची विज दुरुस्ती व देखभाल करण्याच्या कामावेळी मनस्थिती बिघडून अपघात ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकारात पार्श्वभूमीवर कंटाळून तालुक्यातील महावितरणचे तांत्रिक कर्मचारी हे पंधरा दिवसांच्या सामुहिक रजेवर लवकरच जाणार असल्याचे कळाले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.