Skip to main content

वरीष्ठ अधिका-यांच्या आदेशाला कंटाळून महावितरणचे कर्मचारी जाणासामुहिक रजेवर

 


किनवट : कार्यकारी अभियंता यांच्या विज बिल वसुलीसाठी चालू असलेल्या  प्रचंड दबावामुळे  व मे महीन्यात प्रचंड तापमान असतांनाही महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानूसार घेण्यात येणाऱ्या काळजी ऐवजी कार्यकारी अभियंता यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना दबाव तंत्राचा वापर करून सकाळी साडेसात ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत वसुली करण्याचे तोंडी आदेश दिल्यामुळे तालुक्यातील विज कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झााले आहेे.यामुळे महावितरणचे तांत्रिक कर्मचारी हे लवकरच पंधरा दिवसाच्या सामुहिक रजेवर जाणार आहेत.

   विज कर्मचाऱ्यांकडे केवळ विज बिल वसुलीचे काम नसून विज वाहीणी देखभाल दुरुस्ती चे काम देखील २४ तास पहाण्याची जबाबदारी आहे. ऐन उन्हाळ्यातील तापमानाच्या उखाड्यामुळे व वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे विज वाहीण्यावर व रोहीत्रांवर प्रचंड लोड वाढल्यामुळे वारंवार विज पुरवठा खंडीत होणे,वायर तुटने या घटना वाढल्यामुळे विज ग्राहकांना अखंडित विजपुरवठ्या ची सेवा देण्यासाठी अगोदरच अपुऱ्या असणाऱ्या विज कर्मचाऱ्यांना प्रचंड प्रमाणात धावपळ करावी लागत आहे.

त्यातच कार्यकारी अभियंता यांचे तुगलकी आदेश सकाळी साडेसात पासून रात्री साडेआठ पर्यंत केवळ विजबिल वसुली करण्याचे आदश व सदर वसुलीचे काम दिलेल्या उदिष्टापर्यंत न झाल्यास शिस्तभंगाची,पगार कपातीची निलंबनाची व बदलीची कार्यवाही अशा गंभीर स्वरुपाच्या कार्यवाह्या करण्याची वारंवार ताकीद दिल्या जात आहे.

   यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा तान व तनावामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. 

त्यामुळे कर्मचाऱ्यांची विज दुरुस्ती व देखभाल करण्याच्या कामावेळी मनस्थिती बिघडून अपघात ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकारात पार्श्वभूमीवर कंटाळून तालुक्यातील महावितरणचे तांत्रिक कर्मचारी हे पंधरा दिवसांच्या सामुहिक रजेवर लवकरच जाणार असल्याचे कळाले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...