Skip to main content

महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस सचिवपदी शेख परवीन यांची निवड


✍🏻Rajesh patil

किनवट ता.प्र. :-

 अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी  युवा नेते राहुल गांधी  अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष नेता डिसूजा  महाराष्ट्र प्रभारी ममता भूपेश  यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार  व व राष्ट्रीय ओबीसी सेलचे समन्वयक प्रमिल् नाईक यांच्या प्रयत्नाने  परवीन शेख यांना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव पदी निवड करण्यात आली   किनवट सारख्या मागास दुर्गम भागातील महिलांच्या प्रश्नासाठी लढा देणाऱ्या येथील अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक कार्यकर्त्या शेख परवीन यांच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून महिला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष मिस नीता डिसूजा यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीत शेख परवीन यांची महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीबद्दल नांदेड जिल्ह्यातीलकाँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे

 आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने महिला काँग्रेस कमिटीच्या राज्य कार्यकारणीत फेरबदल केले असून तळागाळातील निष्ठावान महिलांना राज्य स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे महिलांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पक्षाला बळकटी देण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार महिला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष नीता डिसूजा यांनी महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यकारिणीला नुकतीच मान्यता दिली असून त्या अनुषंगाने जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रभारी ममता भूपेश यांनी २८मे रोजी काँग्रेस महिला कार्यकारिणी घोषित केली  यात किनवट येथील काँग्रेसच्या ज्येष्ठ  कार्यकर्त्या शेख परवीन यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे शेख परवीन यांनी किनवट तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन  काँग्रेस ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक प्रेमील नाईक यांनी त्यांच्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली होती या नियुक्तीबद्दल नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शेख परवीन यांचे अभिनंदन होत आहे

 किनवट सारख्या ग्रामीण आदिवासी तालुक्यात माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक समाजातील महिलेला पक्षाचे सचिवपद मिळणे खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे काँग्रेसचे  नेते प्रेमील नाईक यांच्या प्रयत्नामुळे मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी प्राप्त झाली राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे व प्रेमील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात संपूर्ण राज्यभरात महिलांची संघटनात्मक बांधणी करून दिलेली जबाबदारी सार्थ ठरवेन अशा प्रतिक्रिया शेख परवीन यांनी नियुक्तीनंतर दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला