Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांचा वाढदिवस किनवट तालुक्यातील विविध ठिकाणी हर्षोउल्हासात साजरा




किनवट /ता.प्रतिनिधी: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस,किनवट टुडे न्युज नेटवर्क चे संपादक,काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते,दै. साहित्य सम्राट चे ता.प्रतिनिधी मा.आनंद भालेराव यांचा वाढदिवस किनवट तालुक्यातील विविध ठिकाणी हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला.

  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट शाखेच्यावतीने किनवट येथील "आज की न्यूज" कार्यालयात वाढदिवसानिमित्त केक  कापून व शाल श्रीफळ देऊन भालेराव यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.

    तसेच गोकुंदा येथे अपंग कामगार संघटना चे सचिव राज माहुरकर यांच्या नेतृत्वात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

  तसेच मदनापूर येथे विनोद पवार यांच्या नेतृत्वात व ता.अध्यक्ष आशिष शेळके,पत्रकार प्रणय कोवे,राज माहुरकर,विशाल गिम्मेकर,रमेश पारचके बंधू सह गावातील सरपंच व तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते. 

     किनवटच्या  सामाजिक, राजकिय व पत्रकारितेच्या क्षेत्रात  गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असलेले शांत, संयमी व उच्चशिक्षितपत्रकार,संपादक,समाजसेवक,शिक्षक आनंद भालेराव यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने जनमाणसात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

     राजकिय क्षेत्रात अनेक पदावर त्यांनी काम केले उत्कृष्ट कार्य केले आहेत.यात नांदेड दक्षता समितीचे सदस्य,गोकुदा उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य अशा अनेक समिती वर काम करत व जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा दांडगा सम्पर्क व  अनुभव उपयोगी पडणार आहे..

   बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले आनंद भालेराव हे पत्रकार क्षेत्रातही अग्रेसर आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या लिखाणातून निस्वार्थ सेवेच्या व्रताने अनेक गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचे कार्य केली आहे व ते आजही करत आहेत.  त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा सरचिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.