Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांचा वाढदिवस किनवट तालुक्यातील विविध ठिकाणी हर्षोउल्हासात साजरा




किनवट /ता.प्रतिनिधी: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस,किनवट टुडे न्युज नेटवर्क चे संपादक,काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते,दै. साहित्य सम्राट चे ता.प्रतिनिधी मा.आनंद भालेराव यांचा वाढदिवस किनवट तालुक्यातील विविध ठिकाणी हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला.

  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट शाखेच्यावतीने किनवट येथील "आज की न्यूज" कार्यालयात वाढदिवसानिमित्त केक  कापून व शाल श्रीफळ देऊन भालेराव यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.

    तसेच गोकुंदा येथे अपंग कामगार संघटना चे सचिव राज माहुरकर यांच्या नेतृत्वात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

  तसेच मदनापूर येथे विनोद पवार यांच्या नेतृत्वात व ता.अध्यक्ष आशिष शेळके,पत्रकार प्रणय कोवे,राज माहुरकर,विशाल गिम्मेकर,रमेश पारचके बंधू सह गावातील सरपंच व तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते. 

     किनवटच्या  सामाजिक, राजकिय व पत्रकारितेच्या क्षेत्रात  गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असलेले शांत, संयमी व उच्चशिक्षितपत्रकार,संपादक,समाजसेवक,शिक्षक आनंद भालेराव यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने जनमाणसात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

     राजकिय क्षेत्रात अनेक पदावर त्यांनी काम केले उत्कृष्ट कार्य केले आहेत.यात नांदेड दक्षता समितीचे सदस्य,गोकुदा उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य अशा अनेक समिती वर काम करत व जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा दांडगा सम्पर्क व  अनुभव उपयोगी पडणार आहे..

   बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले आनंद भालेराव हे पत्रकार क्षेत्रातही अग्रेसर आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या लिखाणातून निस्वार्थ सेवेच्या व्रताने अनेक गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचे कार्य केली आहे व ते आजही करत आहेत.  त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा सरचिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...