Skip to main content

कोठारी(चि)येथे बुद्ध-भीम गितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम १९ मे रोजी

 



किनवट,दि.१५: भगवान बुद्ध, सम्राट अशोक, संत सेवालाल महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रबोधनात्मक बुद्ध-भीमगितांचा कार्यक्रम कोठारी(चि.ता.किनवट)येथे गुरुवारी(दि.१९)रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रदिप नाईक हे राहणार आहे. भारतीय बौद्ध महा सभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके हे उद्घाटन करणार आहेत.या प्रसंगी किनवटच्या संथागार व्रध्दाश्रमाचे संचालक करुणा व अरुण आळणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

   याप्रसंगी विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी, विविध आंबेडकरी पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.सूत्रसंचालन एड.सचिन गिमेकर हे करणार आहेत.यावेळी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्यासह भारतीय महीला शाहिर स्मिता पाटील व जॉली मोरे व संच (मुंबई)यांचा तुफानी शाहिरी जलसा होणार आहे.कार्यक्रमाचे आयोजक सांची बुद्ध विहार हे आहे,तर निमंत्रक गोकुंदा(ता. किनवट)चे माजी सरपंच प्रविण मँकलवार हे आहेत.

   परिसरातील जनतेंनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने विजय पाटील,रमेश कांबळे,पपेश.कांबळे,सुनिल पाईकराव, प्रेमानंद कांबळे,सुधाकर हलवले,निखिल गिमेकर,संदेश हलवले,सुमित कांबळे,स्वप्निल भगत यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...